रायगड ही पिकनिकची जागा नाही - दिग्पाल लांजेकर

    10-Feb-2024
Total Views | 34

raigad 
 
रसिका शिंदे-पॉल
 
मुंबई : सध्या महाराष्ट्रातील विविध गड किल्ल्यांवर गिर्यारोहकांचे जाणे वाढले आहेच. पण या सोबतीला सामान्य माणसे देखील गड किल्ले सर करताना दिसत आहेत. परंतु, कुठेतरी शिवरायांच्या गड किल्ल्यांवर आणि प्रामुख्याने स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडावर लोकं फार चुकीच्या पद्धतीने वावरत असल्याचे निदर्शनास आले आहे. यावरच दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी ‘महाएमटीबी’शी बोलताना अशी वागणूक करणाऱ्यांना रायगड ही पिकनिकची जागा नाही असे खडे बोल सुनावले आहेत. दिग्पाल यांनी रायगडावर त्यांच्या आगामी ‘शिवरायांचा छावा’ या चित्रपटाच्या निमित्ताने माध्यम प्रतिनिधींसह रायगडावर गेले होते. 
 
काय म्हणाले दिग्पाल?
 
“रायगड किल्ल्यावर फार जबाबदारीने यायला हवे. ही जागा म्हणजे पिकनिकची जागा नव्हे. इथे आपल्या स्वराज्याचा दरबार भरत असे. छत्रपती शिवाजी महाराज इथे वावरत असतील. त्यामुळे आता जे स्वातंत्र्य किंवा स्वैराचार किल्ल्यांवर जाऊन काही लोकांकडून केला जात आहे तो शिवरायांच्या उपस्थितीत रायगडावर केला जात असेल का? तर नसेल. त्यामुळे या रायगडाविषयी तीच आब, अदब आणि गांभार्य लोकांना असले पाहिजे असे माझे मत आहे. रायगडावर येणाऱ्या प्रत्येकाने इथल्या मातीच्या प्रत्येक कणाकडे पुज्य भावनेने पाहिले पाहिजे. कारण इथे छत्रपती शिवाजी महाराजांची पावले पडली असतील. छत्रपती शंभुराजे वावरले असतील. कधीतरी राजमाता जिजाऊ इथे येऊन गेल्या असतील. त्यामुळे ही पवित्र पावले रायगडाला लागली असल्यामुळे आपण भान ठेवूनच रायगड आणि शिवरायांच्या तर किल्ल्यांवर वावरले पाहिजे”, असे प्रामाणिक मत दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी मांडले.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
धर्मांतरविरोधी कायदा आणि सध्याचा गोेव्यातील हिंदू समाज

धर्मांतरविरोधी कायदा आणि सध्याचा गोेव्यातील हिंदू समाज

गोवा म्हटले की नजरेसमोर येतात ती फुलांची आरस केलेली देवालये आणि नितांत सुंदर समुद्रकिनारे! मात्र, गेल्या काही वर्षांत हिंदू संस्कृतीच्या सर्व खुणा अभिमानाने मिरवणार्‍या गोव्यामध्ये, धर्मांतरणाच्या द़ृष्टचक्राने वेग घेतला आहे. इस्लामी आणि ख्रिस्ती धर्मांतरणामुळे भविष्यात गोव्यातील हिंदू लोकसंख्या धोक्यात येण्याची चिन्हे आहेत. त्यामुळेच धर्मांतरणविरोधी कायद्याची गरज नुकतीच गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केली आहे. गोव्यातील धर्मांतरणाच्या या वाढत्या समस्येचा घेतलेला मागोवा.....

शिवदूर्गांचा जागतिक सन्मान: नेतृत्वाच्या प्रयत्नांची गाथा...

शिवदूर्गांचा जागतिक सन्मान: नेतृत्वाच्या प्रयत्नांची गाथा...

‘युनेस्को’ने शिवरायांच्या 12 गडकिल्ल्यांना जागतिक वारशाचा दर्जा नुकताच जाहीर केला. या घोषणेनंतर महाराष्ट्राची मान अभिमानाने पुन्हा एकदा उंचवली. त्याचबरोबर पुन्हा एकदा याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न, काहीजणांकडून जाणीवपूर्वक केला जात आहे. पण, प्रत्यक्षात महाराष्ट्राच्या शिरपेचात आलेल्या या यशाचे खरे मानकरी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच आहेत, यात कोणतीही शंका नाही. मुळात या गडकिल्ल्यांना वारसा दर्जा मिळण्याची संपूर्ण प्रक्रिया लक्षात घेतली, तर हे आपल्या नक्कीच लक्षात..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121