गोमांस बंदीवर आसाम सरकारचा हिरवा कंदील

मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांची घोषणा

    05-Dec-2024
Total Views | 33

Beef Ban
 
दिसपुर : आसाम भाजप सरकारने गोमांसवर बंदी घातली आहे. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी ४ डिसेंबर २०२४ रोजी याची घोषणा केली. ते म्हणाले की, राज्यातील रेस्टॉरंट आणि हॉटेलमध्ये गोमांसवर बंदी घालण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणी गोमांसचा वापर करू शकत नाही, असा निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी ते म्हणाले की, याआधी मंदिराच्या ५ किलोमीटरच्या अंतरावर गोमांस खाण्यास बंदी होती, मात्र आता संपूर्ण राज्यात त्याची अंमलबजावणी याप्रकरणात व्यप्ती वाढवली जात आहे.
 
आसामच्या राज्यमंत्रिमंडळाची बैठक नुकतीच पार पडली आहे. त्यामध्ये गोमांसवरील बंदीबाबत निर्णय घेण्यात आला. ते म्हणाले की, गोहत्या बंद करण्यासाठी आम्ही तीन वर्षापूर्वी कायदा अंमलात आणला. यामुळे गोहत्या थांबवण्यास यश मिळाले असे म्हटले तरीही वावगे ठरणार नाही. रामगुरीच्या पोटनिवडणुकीच्या निकालानंतर भाजप आणि काँग्रेसमध्ये या मुद्द्यावरून शाब्दिक चकमकी सुरू झाल्या असताना गोमांस बंदीचा निर्णय आसाम सरकारने घेतला. नुकतेच आसामच्या मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसला आव्हान दिले होते. ते म्हणाले की, मतदारांनी पाठिंबा दिल्यास सरकार राज्यात गोमांसावर पूर्णपणे बंदी घालेल, असे म्हटले होते.
 
रकीबुल हुसैन हे गेल्या अडीच दशकांपासून समगुरीचे आमदार होते. लोकसभा निवडणुकीत ते धुबरी येथून खासदार झाले. यानंतर पोटनिवडणुकीत काँग्रेसने त्यांचा मुलगा तनजील हुसैन यांना उमेदवारी देण्यात आली. मात्र या जागी ६० टक्के लोक मुस्लिम आहेत. मात्र असे असूनही काँग्रेसला आपली जागा वाचवता आली नसल्याची माहिती त्यांनी सांगितली आहे. त्यामुळे आसाम भाजपने गोमांसबाबत दिलेले आश्वासन सत्यात आणले गेले आहे. 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121