महापरिनिर्वाण दिनासाठी चैत्यभूमी सज्ज! कोकण विभागीय आयुक्तांकडून सोयीसुविधांची पाहणी

    03-Dec-2024
Total Views | 40
 
image
 
मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवरील सुविधांचा कोकण विभागीय आयुक्त डॉ. राजेश देशमुख यांनी आढावा घेतला. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशभरातून लाखों अनुयायी दादरच्या चैत्यभूमीवर त्यांना अभिवादन करण्यासाठी येत असतात. दरम्यान, त्यांच्यासाठी प्रशासनामार्फत विविध सोयीसुविधा केल्या जातात. डॉ. देशमुख यांच्यामार्फत या कामांची पाहणी करण्यात आली.
 
यावेळी कोकण विभागीय अतिरिक्त आयुक्त विवेक गायकवाड, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे सहायक आयुक्त अजितकुमार आंबी, सहायक पोलीस आयुक्त प्रवीण तेजाळे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू भीमराव आंबेडकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे, समन्वय समितीचे उपाध्यक्ष महेंद्र साळवे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. यावेळी सर्व मान्यवरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले. तसेच चैत्यभूमी येथे दाखल झालेल्या अनुयायांना खाद्य पदार्थांच्या किटचे वाटपही करण्यात आले.
 
 हे वाचलंत का? - मी चेकअपसाठी आलो होतो! माझी प्रकृती उत्तम : एकनाथ शिंदे
 
याप्रसंगी बोलताना विभागीय आयुक्त डॉ. राजेश देशमुख म्हणाले की, "चैत्यभूमीवर येणाऱ्या अनुयायांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात येत आहे. तसेच त्यांच्यासाठी वैद्यकीय कक्षही उभारण्यात येतो. छत्रपती शिवाजी महाराज मैदान (शिवाजी पार्क) आणि परिसरात पुरविण्यात येणाऱ्या नागरी सेवा-सुविधांबाबत सर्व यंत्रणांनी सूक्ष्म नियोजन करत समन्‍वय साधून कार्यवाही करावी. तसेच उपलब्ध करून देण्यात आलेल्या सुविधा अनुयायांना मिळतात की, नाही याची खात्री करावी," असे निर्देश त्यांनी दिले.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

संत गाडगे महाराज विचार मंच महाराष्ट्र राज्य आणि ज्ञानज्योत फाऊंडेशन महाराष्ट्र यांच्या वतीने देण्यात येणारा ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ या वर्षी लेखक, साहित्यिक जयेश मेस्त्री यांना प्राप्त झाला आहे. दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील साहित्य क्षेत्रात उत्तम कामगिरी करणार्‍या साहित्यिकांचा गौरव करण्यात आला. दिनांक ०७ जून २०२५ रोजी पुणे येथील सदाशिव पेठेतील वेदशास्त्रोत्तेजक सभागृह येथे हा सुंदर सोहळा पार पडला. या प्रसंगी प्रसिद्ध उद्योजक डॉ. रामदास कुटे हे उद्घाटक म्हणून उपस्थित होते. तसेच ..

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

: मराठी साहित्यातील प्रतिष्ठीत मानल्या जाणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनचा ९९ व्या सोहळा आगामी वर्षात साताऱ्यात पार पडणार आहे. ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजन करण्याचा मान साताऱ्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेला आणि मावळा फौंडेशनला मिळणार आहे.अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पुणे येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी, उपाध्यक्ष गुरुय्या स्वामी, कार्यवाह सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121