उबाठा गटाला धक्का! अद्वय हिरे यांचे मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्यत्व रद्द

    25-Dec-2024
Total Views |
 
Advay Hire
 
नाशिक : उबाठा गटाचे उपनेते अद्वय हिरे यांचे मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. जिल्हा उपनिबंधक फैय्याज मुलाणी यांनी हा निर्णय दिला आहे. बाजार समितीच्या मासिक सभेला सात वेळा गैरहजर राहिल्याने ही कारवाई केल्याचे सांगण्यात येत आहे.
 
मंगळवार, २४ डिसेंबर रोजी बाजार समिती प्रशासनाला याबाबतचे आदेश प्राप्त झालेत. २३ ऑगस्ट रोजी मालेगाव कृषी उत्पन्न उत्पन्न बाजार समितीचे मतदार धर्मा शेवाळे यांनी जिल्हा उपनिबंधकांकडे तक्रार केली होती. समितीचे सभापती सातत्याने मासिक सभांना गैरहजर राहत असल्याने त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी त्यांनी केली होती. त्यानंतर यावर निबंधकांकडे सुनावणी पार पडली. या सुनावणीनंतर उपनिबंधक फैय्याज मुलाणी यांनी अद्वय हिरे यांचे सदस्यत्व रद्द करण्याचा निर्णय दिला.
 
उबाठा गटाचे उपनेते असलेले अद्वय हिरे यांनी गेल्या विधानसभा निवडणूकीत मंत्री दादा भुसे यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. मात्र, यात त्यांचा पराभव झाला. त्यानंतर आता त्यांचे मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्यत्वदेखील रद्द झाल्याने उबाठा गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
जयंत पाटील यांनी राजीनामा दिला, की घेतला? - चर्चांना उधाण; शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष, रोहित पवारांचे स्वप्न पुन्हा भंगले

जयंत पाटील यांनी राजीनामा दिला, की घेतला? - चर्चांना उधाण; शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष, रोहित पवारांचे स्वप्न पुन्हा भंगले

स्थानिक स्वराज्य संस्थांचा बिगुल वाजला असताना, शरद पवारांनी अचानक प्रदेशाध्यक्ष बदलल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ७ वर्षे एकहाती पक्ष सांभाळणाऱ्या जयंत पाटलांनी अचानक राजीनामा द्यावा आणि तो शरद पवारांनी स्वीकारावा, इतक्यापुरती ही घटना मर्यादीत नाही. त्यामुळे हा राजीनामा खरोखरच स्वेच्छेने दिला गेला की पक्षातील गटबाजीमुळे त्यांना हटवण्यात आले, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. दुसरीकडे, शशिकांत शिंदे यांच्या गळ्यात प्रदेशाध्यक्ष पदाची माळ पडली असली, तरी रोहित पवार आणि समर्थकांत भलती नाराजी पसरल्या..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121