जागतीक वनीकरणासाठी युपीच्या चार शेतकऱ्यांची "विश्व पदयात्रा"

२३ ते २८ डिसेंबर या कालावधीत ठाण्यात जनजागरण

    24-Dec-2024
Total Views | 64
UP Farmer

ठाणे : पर्यावरण संवर्धनासाठी उत्तर प्रदेशातील (युपी) चार तरुण जगाला संदेश देण्यासाठी जगभ्रमंतीवर निघाले आहेत. युपीतील एका लहान गावातील हे चारही तरूण शेतकरी ( UP Farmer ) असुन मानवतेच्या भविष्यासाठी त्यांनी 'विश्व पदयात्रा' काढून जागतिक वनीकरण मिशन सुरू केले आहे. २३ ते २८ डिसेंबर या कालावधीत हे तरूण ठाणे जिल्हयात जनजागरण करणार आहेत.

गिनीज तसेच लिम्का बुकमध्ये नोंद झालेल्या अवध बिहारी लाल हे १९८० पासुन पर्यावरणासाठी पदयात्रेला निघाले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली २००१ पासून उत्तर प्रदेशातील जितेंद्र प्रताप, महेंद्र प्रताप, गोविंदा नंद आणि निश्चल मौर्य हे चार तरुण शेतकरी जगभरातील नागरिकांना पर्यावरणाचे महत्व पटवून देण्यासाठी निघाले आहेत. त्यांच्या टीममध्ये आता २० सदस्यांपर्यंत पोहचली असून ही टीम सध्या महाराष्ट्राच्या विविध भागातून पुढे पुढे जात आहे. पालघर मधून ठाण्यात दाखल झालेल्या या चार शेतकऱ्यांचे वय ३० ते ३८ वर्षे आहे. हे सर्व शेतकरी आज पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने जगभरातील लोकांना "झाडे लावा, पृथ्वी वाचवा" असा संदेश देत आहेत. या शेतकऱ्यांनी ११ देशांचा दौरा केला असून ४.४८ लाख किलोमीटरची पायपीट करून ६०० जिल्ह्यांमध्ये १४.५० कोटी वृक्षांची लागवड केली आहे.

केंद्र व राज्य सरकारच्या विविध जनकल्याणकारी योजना बरोबरच हे तरूण पर्यावरणाचे रक्षण करा, झाडे लावा, पृथ्वी वाचवा, नद्यांचे संरक्षण करा, मुली वाचवा - मुली शिकवा, रस्त्याची सुरक्षा, पाणी जपा आणि स्वच्छ भारत मिशन आदींची जनजागृती शाळा - महाविद्यालयामधुन करीत आहेत.

अग्रलेख
जरुर वाचा
सिगारेटच्या धुरामुळे दादरमधील रहिवासी त्रस्त, शेवटी लावावे लागले

सिगारेटच्या धुरामुळे दादरमधील रहिवासी त्रस्त, शेवटी लावावे लागले 'नो स्मोकिंग'चे फलक

गेल्या दोन वर्षांपासून मुंबईतील दादर पश्चिम येथील इंद्रवदन को-ऑप. हाउसिंग सोसायटीच्या आजूबाजूला सतत धुम्रपान चालू असल्याने लोक त्रस्त झाले होते. सोसायटीशेजारी एक कार्यालय आणि मॉल असून तिथे काम करणारे लोक दिवसभर सिगारेट ओढण्यासाठी सोसायटीच्या कुंपणाजवळ येतात. त्यांच्या धुराचा त्रास सोसायटीच्या प्रत्येक घरात जाणवतो. खिडक्या बंद करूनही धूर घरात येतो, त्यामुळे लहान मुलं, वृद्ध आणि आजारी व्यक्तींना विशेष त्रास होतो. त्यामुळे सोसायटीतील रहिवाशांनी आता आवाज उठवण्याचा निर्णय घेतला आहे...

पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया समोर! म्हणाल्या, प्रत्येक गोष्टीला वेळ...

पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया समोर! म्हणाल्या, "प्रत्येक गोष्टीला वेळ..."

(Rohini Khadse Breaks Silence After Husband Pranjal Khewalkar’s Arrest) राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना पुण्यातील खराडी येथे सुरू असलेल्या रेव्ह पार्टीतून अटक करण्यात आली. पुणे पोलिसांनी रविवारी मध्यरात्री ही कारवाई केली. प्रांजल खेवलकर यांच्यावर ही रेव्ह पार्टी आयोजित केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या पार्टीदरम्यानचा व्हिडीओ पुढे आल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर आता रोहिणी खडसे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांन..

पहलगाम हल्ल्यावर पी. चिदंबरम यांचं वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले, दहशतवादी पाकिस्तानचे की भारतातच...

पहलगाम हल्ल्यावर पी. चिदंबरम यांचं वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले, "दहशतवादी पाकिस्तानचे की भारतातच..."

(P Chidambaram's Remark on Pahalgam Terror Attack) पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर त्याला प्रत्युत्तर म्हणून मे महिन्यात ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आले. यामध्ये भारताने हवाई हल्ले करत पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे नऊ तळ उद्ध्वस्त केले. यासंदर्भातच विरोधी पक्षांनी संसदेत ऑपरेशन सिंदूरवर चर्चेची मागणी केली होती, जी सत्ताधाऱ्यांनी मान्य केली. मात्र संसदेत चर्चेपूर्वी, ज्येष्ठ काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी एका मुलाखतीत केलेले वक्तव्य समोर आले आहे. ज्यावरुन मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121