बांगलादेशात श्याम दास प्रभू यांना विनावॉरंट अटक

हॅशटॅग टोटल मलाऊन डेथ ट्रेंड चालवत हिंदूंवर लक्ष

    02-Dec-2024
Total Views | 42

Bangladeshi Hindu
 
ढाका : बांगलादेशात हिंदूंवरील (Bangladeshi Hindu) अत्याचारात सातत्याने वाढ होत आहे. २९ नोव्हेंबर २०२४ रोजी चितगाव पोलिसांनी हिंदू पुजारी श्री श्याम दास प्रभू यांना अटक केली आहे. इस्कॉनचे दास यांनी याप्रकरणाची माहिती सोशल मीडियावर दिली आहे. चिन्मय दास यांना २५ नोव्हेंबर रोजी देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. मात्र आता याप्रकरणानंतर एका बांगलादेशी हिंदूला विनावॉरंट पकडण्यात आले असल्याची माहिती आहे.
 
 
 
श्री श्याम दास प्रभू चिन्मय दास यांना भेटण्यासाठी तुरूंगात गेले असता, त्यांना पकडण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. अटक करण्यासाठी ज्या वॉरंटची आवश्यकता असते, तेच वॉरंट अधिकृतरित्या दिले गेले नसून त्यांना अटक करण्यात आली आहे. एकीकडे प्रशासन हिंदूंना अटक करण्यात आणि त्यांच्यावर अत्याचार करण्यासाठी व्यस्तच असल्याचे चित्र आहे. तर दुसरीकडे बांगलादेशात कट्टरपंथी सोशल मीडियावर उघडपणे हिंदूंना मारण्याचे आवाहन करत आहेत. इस्लामिक कट्टरतावादी सोशल मीडियावर टोटल मलाऊन डेथ म्हणजे सर्व हिंदूंना मारले जावे, अशा हॅशटॅगसह पोस्ट शेअर करत असल्याची माहिती समोर आली आहे.
 
 
 
संबंधित हॅशटॅगचा वापर करत एकूण २००००० हून अधिक पोस्ट शेअर केल्या गेल्या आहेत. असे कृत्य करणारे लोक केवळ आणि केवळ कट्टरपंथी आहेत. दरम्यान या हॅशटॅगचा वापर हा केवळ पहिल्यांदा नाहीतर याआधी अनेकदा करण्यात आला होता. हिंदूंविरोधात कट्टरपंथी एक यावे या हेतूने हे कृत्य केले जात असल्याचे सांगण्यात येत आहे.
 
बांगलादेशी इस्लामिक कट्टरवाद्यांनी हिंदूंविरोधात असा द्वेष निर्माण करत हिंदूंच्या चिंतेत वाढ निर्माण झाली आहे. हिंदुत्वविरोधी घटनानंतर सरकारची आजवरची वृत्ती पाहिल्यास लक्षात येते की, अशा घटनांकडे दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे. इस्कॉनप्रकरणी अनेकांना अटक केली जाते. मात्र अन्याय करणाऱ्यांवर कोणतीही कारवाई होत नसल्याचे बांगलादेशातील वास्तव हे नाकारता येणारे नाही.
 
अग्रलेख
जरुर वाचा
गोरेगाव-मुलुंड जोड रस्त्याच्या भुयारी कामाला वेग राष्ट्रीय उद्यानातील वन खात्‍याची १९.४३ हेक्‍टर जागा बीएमसीकडे वळती - केंद्रीय पर्यावरण, वन व वातावरणीय बदल मंत्रालय यांची अंतिम मान्‍यता

गोरेगाव-मुलुंड जोड रस्त्याच्या भुयारी कामाला वेग राष्ट्रीय उद्यानातील वन खात्‍याची १९.४३ हेक्‍टर जागा बीएमसीकडे वळती - केंद्रीय पर्यावरण, वन व वातावरणीय बदल मंत्रालय यांची अंतिम मान्‍यता

मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या महत्वाकांक्षी गोरेगाव - मुलुंड जोड रस्ता प्रकल्प (तिसरा टप्पा) अंतर्गत बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जाणाऱ्या जुळ्या बोगद्याच्या बांधणीला आता गती मिळणार आहे. प्रत्येकी ४.७ किलोमीटर अंतराच्या आणि ४५.७० मीटर रुंदीच्‍या जुळ्या बोगद्यासाठी आवश्‍यक असलेली १९.४३ हेक्‍टर वनजमीन बृहन्‍मुंबई महानगरपालिकेकडे वळती करण्‍यास केंद्रीय पर्यावरण, वन व वातावरणीय बदल मंत्रालय यांची अंतिम मान्‍यता मिळाली आहे. त्‍यानुसार, अटी व शर्तींचे अनुपालन तसेच पूर्ततेची ..

राज्यातील १८ हजार शाळांमध्ये पटसंख्या २० पेक्षा कमी

राज्यातील १८ हजार शाळांमध्ये पटसंख्या २० पेक्षा कमी

१ हजार ६५० गावांमध्ये प्राथमिक, तर ६ हजार ५५३ गावांमध्ये उच्च प्राथमिक शाळा नाहीत राज्यातील एक लाखांहून अधिक शाळांपैकी सुमारे १८ हजार शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या २० पेक्षा कमी आहे. तर १ हजार ६५० गावांत प्राथमिक आणि ६ हजार ५५३ गावांत उच्च प्राथमिक शाळा उपलब्ध नाहीत. विद्यार्थी संख्येत घट झाली असली, तरी त्या शाळा सुरूच राहतील आणि त्या ठिकाणी शिक्षणात अडथळा येणार नाही, याची संपूर्ण काळजी घेतली जाईल. ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे, तेथे अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्यात येत असल्याची माहिती ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121