संघाची शिकवण जोडणारी आहे तोडणारी नाही! : एकनाथ शिंदे

    19-Dec-2024
Total Views | 50

Eknath Shinde at Reshimbagh

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Eknath Shinde at Reshimbagh) 
"राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवार आणि शिवसेना यांचे विचार एकसारखे आहेत. निरपेक्ष भावनेने कसे काम करावे हे संघ परिवाराकडून शिकावं. संघाची शिकवण जोडणारी आहे तोडणारी नाही.", अशी भावना राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. नागपूर येथे सुरु असललेल्या महाराष्ट्र विधानसभा हिवाळी अधिवेशन त्यांनी गुरुवार, दि. १९ डिसेंबर रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशिमबाग कार्यालयास भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते.

एकनाथ शिंदेंनी दरम्यान संघाचे संस्थापक आद्य सरसंघचालक प.पू.डॉ. केशव बळीराम हेडगेवार व संघाचे द्वितीय सरसंघचालक प.पू.श्री. गोळवलकर गुरुजी यांच्या स्मृतीसही अभिवादन केले. पुढे ते म्हणाले, " संघाच्या शाखेतूनच माझ्या राजकीय प्रवासाची सुरुवात झाली. त्यानंतर बाळासाहेबांचे विचार आणि दिघे साहेबांची शिकवण त्यात जोडली गेली. कुठलीही प्रसिद्धीची अपेक्षा न ठेवता संघाचा स्वयंसेवक काम करत असतो. देशभरात संघाच्या लाखो शाखा आहेत. १९२५ मध्ये स्थापन झालेल्या संघाला १०० वर्ष पूर्ण होत आहेत, हे विशेष आहे. एखादी संस्था सुरु होऊन १०० वर्ष देशाच्या उभारणीत कार्यरत आहे. राष्ट्रसेवेत असलेले संघाचे योगदान कोणालाही नाकारता येणार नाही."

"मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा संघ स्वयंसेवक आहेत, ते पुन्हा मुख्यमंत्री झाले याचा मला आनंद आहे. याठिकाणी आल्यावर एक विशेष प्रेरणा, ऊर्जा मिळते. जो खऱ्या अर्थाने निरपेक्ष भावनेने समाजसेवा करणारा आहे, त्याने एकदातरी याठिकाणी यावे आणि प्रेरणा घेऊन जावी.", असे म्हणत एकनाथ शिंदेंनी रेशिमबागेतील आपला अनुभव व्यक्त केला.
अग्रलेख
जरुर वाचा
राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, मला विचारल्याशिवाय...

राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, "मला विचारल्याशिवाय..."

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षातील सर्व नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना एक ठाम आणि स्पष्ट आदेश दिला आहे. राज ठाकरे यांनी सांगितले की, "पक्षातील कोणताही नेता, कार्यकर्ता, प्रतिनिधी यांनी कोणत्याही वृत्तपत्र, वृत्तवाहिनी किंवा डिजिटल माध्यमांशी संपर्क साधू नये. तसेच, स्वतःचे मत व्हिडीओच्या माध्यमातून सोशल मीडियावर अपलोड करणेही थांबवावे." याशिवाय, त्यांनी पक्षाचे अधिकृत प्रवक्ते यांनाही इशारा दिला आहे. राज ठाकरे म्हणाले, "ज्यांना अधिकृत प्रवक्त्याची जबाबदारी दिली आहे त्यांनी सुद्धा माझी परवानगी घेतल्याशिवाय ..

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

राज्यातील विविध विकास कामे व प्रकल्पांना किनारी क्षेत्र नियमन (सीआरझेड) अंतर्गत वेळेवर मंजुरी मिळावी यासाठी महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचना व्हावी यासाठी राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून, केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचित करत अधिसूचना जारी केली आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121