रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोरांचे ५२ हजारांहून अधिक बनावट कागदपत्रे उघडकीस
पाकिस्तान, बांगलादेश आणि नेपाळसह भारतातील इतर राज्यांचा समावेश
16-Dec-2024
Total Views | 137
रायबरेली : उत्तर प्रदेशातील रायबरेली येथे १८ जुलै २०२४ रोजी हजारो रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोरांच्या जन्म दाखल्यांची बनावट कागदपत्रे उघडकीस आली आहेत. आता याप्रकरणाची चौकशी करण्यात आली असून एकूण ५२ हजारांहून अधिक बनावट कागदपत्रे उघडकीस आली होती. एकूण ५२ हजारांहून अधिक बनावट जन्मदाखले असल्याची माहिती समोर आली आहे. या फसवणुकीत पाकिस्तान, बांगलादेश आणि नेपाळसह भारतातील अनेक राज्यातील नागरिकांच्या प्रमाणपत्रांचा यामध्ये समावेश होत आहे. ही सर्व बनावट कागदपत्रे रद्द करण्यात आली होती, असे सरकारने सांगितले होते.
प्रसारमाध्यमाच्या मिळालेल्या माहितीनुसार, एकूण ११ गावातील बनावट जन्म दाखल्यामुळे मूळ नागरिक त्रस्त आहेत. या ११ गावातील एकूण ५२,५९४ जन्म दाखले बनावट असल्याची माहिती समोर आली आहे. हे जन्म जन्मदाखले बिहार, मध्य प्रदेश, झारखंड, तमिळनाडू, केरळ आणि पंजाब तसेच बांगलादेश, पाकिस्तान आणि नेपाळ या राज्यांतील नागरिकांच्या नावाने बनवण्यात आली होती. हे सर्व संबंधित बनावट जन्मदाखले रद्द करण्याचे आदेश उपसंचालक पंचायती राज सावंत आनंद सिंह यांनी माहिती दिली.
यासोबतच रायबरेली जिल्ह्यातील डीपीआरओ यांनी भविष्यात जन्म- मृत्यू दाखले देताना विशेष काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. अनेक गावांमध्ये फसवणूक करणाऱ्यांची एकाच दिवसांत ५०० ते १००० बनावट जन्मदाखले तयार करण्यात आले होते. ज्याच एकाच सूत्रधाराने बनवलेल्या आयडी आणि पासवर्डचा वापर करत एका दिवसांत बनावट जन्मदाखले तयार करण्याचे काम केले होते.
याप्रकरणात मुख्य आरोपी हा मोहम्मद जीशान असून तो रायबरेली येथील सलून येथील रहिवासी होता. त्यांच्यासह रियाझ, सुहेल खान आणि या प्रकरणात सामील असलेले विजय सिंह यांना पकडण्यात आले आहे. याप्रकरणाच्या तपासामध्ये एटीएससोबत एनआयएचाही समावेश आहे. तसेच तपास यंत्रणा आणि याप्रकरणातील फसणुकीत असलेल्या इतर काही आरोपींचाही समावेश असल्याची माहिती समोर येत आहे.