‘वारसा आणि विकासाच्या समन्वयानेच भारत विश्वगुरु बनेल’

    15-Dec-2024
Total Views | 37
Yogi Adityanath

मुंबई : “एक भारत, श्रेष्ठ भारत’ हे सर्वश्रुत आहेच. भारताचा ( India ) वारसा आणि विकास यांचा समन्वय साधून पुढे जाण्याचे व्हिजन पंतप्रधान मोदीजींनी भारताला दिले. त्यास मजबूतीने आपल्याला पुढे न्यायचे आहे. तरच भारत विश्वगुरु म्हणून पुढे येईल,” असे प्रतिपादन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले.

‘वर्ल्ड हिंदू इकोनॉमिक फोरम’च्या तीन दिवसीय वार्षिक परिषद वांद्रे-कुर्ला संकुलातील ‘जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर’ येथे सुरू झाली असून, परिषदेच्या दुसर्‍या दिवशी शनिवार, दि. १४ डिसेंबर रोजी योगी आदित्यनाथ यांनी उपस्थितांना संबोधित केले. ते म्हणाले की, “जगात असे काही लोक आजही आहेत, ज्यांना भारताचा होत असलेला सन्मान पाहावत नाही. हजारो वर्षांपूर्वी प्रभू श्रीरामांनी भारतभूमीत रामराज्य साकार केले होते. अशा भारतात जन्म घेणे दुर्लभ आहे आणि त्यापेक्षा मनुष्याच्या रुपात जन्माला येणे आणखी दुर्लभ आहे. आज जे दहशतवादाला प्रोत्साहन देत आहेत, तेच आज भारताच्या वारसा हक्कावर दावे करत आहेत.

‘वर्ल्ड हिंदू इकॉनॉमिक फोरम’चे संस्थापक स्वामी विज्ञानानंदजी यांच्याविषयी कौतुकोद्गार काढत योगी आदित्यनाथ म्हणाले की, “प्राचीन काळात भारतातील ऋषीमुनी प्रचारकाच्या रुपात जगभरात आपल्या आध्यात्मिक ज्ञानाचा प्रसार सामान्य नागरिकांमध्ये करायचे, तेथील परिस्थितीचा बारकाईने अभ्यास करायचे. भारताच्या याच प्राचीन ऋषी परंपरेचे प्रचारक म्हणून भारताच्या ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडरच्या रुपात स्वामी विज्ञानानंदजी आजही निरंतरपणे त्याच निष्ठेने, तत्परतेने कार्य करत आहेत. ‘वर्ल्ड हिंदू इकॉनॉमिक फोरम’ त्याचाच एक परिपाक आहे,” असे ते म्हणाले.

भारतात ‘समान नागरी कायदा’ लागू व्हायला हवा. जग म्हणते बहुसंख्याक समाज जे सांगतो, व्यवस्था त्याप्रमाणे संचालित होते. परंतु, भारत स्वतः म्हणतो की, भारतात अल्पसंख्याक आणि बहुसंख्याकचा भेद समाप्त व्हायला हवा आणि ‘समान नागरी कायदा’ लागू व्हायला हवा. पण, आज देशात उलटच होते आहे. याला विरोध करणार्‍यांचा पर्दाफाश करायला हवा.

काशीमध्ये २०१४ सालापूर्वी वर्षभरात ५० लाख पर्यटक यायचे तर वाटायचे की, भरपूर लोक आले. काशीचा जेव्हा पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात विकास झाला, १६ कोटी लोक यावर्षी काशीमध्ये आले. काशीविश्वनाथ धाम पूर्णत्वास येईल, त्यानंतर हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशच्या अर्थकारणावर त्याचा नक्कीच चांगला परिणाम होईल, अशी आशा आहे.

यावर्षी ४० कोटी श्रद्धाळू प्रयागराजमध्ये होणार्‍या कुंभमेळ्यात सहभागी होतील, असा अंदाज आहे. दहा हजार एकर क्षेत्रफळात कुंभमेळ्याचे आयोजन केले आहे. अध्यात्मिक, सांस्कृतिक एकात्मतेच्या मेळाव्यास साकारण्यासाठी सरकार तत्पर आहे. यूपीची ग्रोथ स्टोरी महाकुंभच्या माध्यमातून प्रत्येकाला अनुभवायला मिळेल.

युपीसारखे इंडस्ट्रीचे वातावरण देशात कुठे नाही

कुठलाही देश मोठा तेव्हाच होतो, जेव्हा तो आर्थिकदृष्ट्या विकसित होतो. भारत आर्थिक महाशक्ती म्हणून पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात पाचव्या क्रमांकावर आला आहे. इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत यूपी कमजोर नाही. युपीमध्ये ज्याप्रमाणे इंडस्ट्रीचे वातावरण आहे, तसे सार्‍या देशात कुठे नाही. भारताला वैश्विक शक्ती म्हणून जर मोठे करायचे असेल, तर सर्वात प्रथम त्यास आर्थिकदृष्ट्या मजबूत बनवावे लागेल. महाराष्ट्रही त्याच्याच जोडीला मजबूत झाला आहे, आता सर्वांना एकत्र येऊन इतर राज्यांनाही मजबूत करण्याची आपली जबाबदारी आहे.

सुरेश भगेरिया, मुंबई महानगर संघचालक


अग्रलेख
जरुर वाचा
डिजिटल व्यवहारविश्वात हवे सायबर खबरदारीचे भान

डिजिटल व्यवहारविश्वात हवे सायबर खबरदारीचे भान

जगभरात भारताच्या डिजिटल प्रगतीची प्रशंसा केली जाते. ‘युनिफाईड पेमेंट इंटरफेस’ (यूपीआय)ची सेवा जगभरातील काही देशांनी स्वीकारली आहे. भारताची डिजिटल क्षेत्रातील ही प्रगती विकसित भारताच्या दिशेने टाकलेले हे स्मार्ट पाऊल म्हणावे लागेल. मोदी सरकारला नुकतीच ११ वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्ताने, सरकारच्या अनेक उपलब्धींपैकी एक असलेल्या डिजिटल व्यवहार प्रणालीचेही विशेषत्वाने कौतुक करण्यात आले. पण, अशापद्धतीने व्यवहार करताना बँक ग्राहकांनी ‘यूपीआय’ आणि ‘डिजिटल वॉलेट’ पेमेंट सिस्टममधील फरक समजून घेण्याबरोबरच खबरदारी ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121