तुतारीतून तुष्टीकरणाची भेसूर बांग देणाऱ्या महेश कोठेंची उमेदवारी रद्द करा!

चित्रा वाघ यांची मागणी

    08-Nov-2024
Total Views | 228
 
Chitra Wagh
 
मुंबई : तुतारीतून तुष्टीकरणाची भेसूर बांग देणाऱ्या शरद पवार गटाच्या महेश कोठेंची उमेदवारी रद्द करा, अशी मागणी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केली आहे. महेश कोठे यांनी एका विशिष्ट समाजातील लोकांना एक धार्मिक चांदीची फ्रेम देत मत देण्याचे आव्हान केले. त्यामुळे शरद पवार गटाने आचारसंहितेच्या नियमाचा भंग केल्याचे चित्रा वाघ यांनी म्हटले आहे.
 
चित्रा वाघ म्हणाल्या की, "जात-पात, धर्म, पंथ या आधारावर मत न मागण्याच्या आचारसंहितेच्या नियमाला राष्ट्रवादी शरद पवार गटाने थेट धाब्यावरच बसवले आहे. उत्तर सोलापूरच्या शरद पवार गटाचे उमेदवार महेश उर्फ अण्णा विष्णुपंत कोठे यांनी आचार संहितेचा भंग करत एका विशिष्ट समाजातील लोकांना एक धार्मिक चांदीची फ्रेम देत मत देण्याचं आव्हान केले."
 
"तुतारीतून तुष्टीकरणाची भेसूर अशी बांग देणारे शरद पवार गटाचे उमेदवार महेश कोठेंची उमेदवारी रद्द झालीच पाहिजे. महाविकास आघाडीचे नेते जातीवादाच्या जोरावर महाराष्ट्र काबिज करू पाहताहेत. त्यामुळेच महाराष्ट्रातल्या जनतेने आता सजग राहिलं पाहिजे. तुम्हीच या तुष्टिकरणाच्या विळख्यातून महाराष्ट्राला बाहेर काढू शकता. येत्या २० तारखेला मतदानासाठी आवर्जून बाहेर पड. सगळी षडयंत्र उधळून लावा," असे आवाहन त्यांनी केले आहे.
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पात सर्वाधिक उंच पूल ; १२ मजली इमारतीच्या उंचीचा पूल प्रगतीपथावर

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पात सर्वाधिक उंच पूल ; १२ मजली इमारतीच्या उंचीचा पूल प्रगतीपथावर

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी साबरमती नदीवर ३६ मीटर उंच म्हणजेच १२ मजली इमारतीइतक्या उंचीचा पूल सध्या अहमदाबादमधील साबरमती नदीवर बांधला जात आहे. एकूण ४८० मीटर लांबीचा हा पूल पश्चिम रेल्वेच्या अहमदाबाद–दिल्ली मुख्य मार्गालगत बांधला जात आहे. ज्याची उंची सुमारे १४.८ मीटर आहे. हा पूल पूर्ण झाल्यानंतर, तो केवळ आधुनिक संपर्काचे प्रतीक ठरणार नाही तर हाय-स्पीड पायाभूत सुविधांमध्ये व अस्तित्वातील रेल्वे नेटवर्कमध्ये सुसंवाद कसा साधता येतो याचे उत्कृष्ट उदाहरणही ठरेल...

शाहू, फुले, आंबेडकर आणि अण्णा भाऊंसारखे महापुरुष असताना लेनिन-मार्क्स कशासाठी?

शाहू, फुले, आंबेडकर आणि अण्णा भाऊंसारखे महापुरुष असताना लेनिन-मार्क्स कशासाठी?

"भारताच्या सामाजिक परिवर्तनाच्या लढ्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि अण्णा भाऊ साठे यांसारखे थोर विचारवंत असताना, लेनिन आणि मार्क्ससारख्या परकीय विचारवंतांची गरजच काय?” असा थेट सवाल ज्येष्ठ शाहीर संदेश विठ्ठलराव उमप यांनी उपस्थित केला. अण्णा भाऊ साठे जयंतीनिमित्त दै. ‘मुंबई तरुण भारत’च्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘महाएमटीबी’ या युट्यूब वाहिनीवरील विशेष मुलाखतीत ते बोलत होते. या मुलाखतीत त्यांच्यासोबत गायिका रागिणी मुंबईकर आणि ढोलकीवादक महेश लोखंडे हेही उपस्थित होते...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121