लाल संविधान दाखवून कुणाला इशारा देताहात? उपमुख्यमंत्री फडणवीसांचा राहूल गांधींना सवाल

    06-Nov-2024
Total Views | 130
 
Fadanvis
 
कोल्हापूर : लाल संविधान दाखवून तुम्ही कुणाला इशारा देत आहात? असा सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काँग्रेस नेते राहूल गांधींना केला आहे. तसेच राहूल गांधी हे समाजात अराजकता तयार करण्याचे काम करत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. त्यांनी बुधवारी कोल्हापूर येथे माध्यमांशी संवाद साधला.
 
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "भारत जोडो या समुहामध्ये अनेक संघटना अतिशय डाव्या विचाराच्या आहेत. त्यांची ध्येयधोरणे आणि कामाची पद्धत ही अराजक पसरवणारी आहे. एकीकडे राहूल गांधी एक पुस्तक आपल्याला दाखवतात. संविधानचा सन्मान केला पाहिजे. पण मग लाल संविधान का? लाल पुस्तक दाखवून तुम्ही कुणाला इशारा देत आहात?" असा सवाल त्यांनी केला.
 
ते पुढे म्हणाले की, "संविधान आणि भारत जोडोच्या नावाखाली अराजकता पसरवणाऱ्या लोकांना एकत्रित करून समाजात विद्वेष आणि अराजकता तयार करण्याचे काम सुरु आहे. अर्बन नक्षलवाद यापेक्षा काही वेगळा नाही. लोकांची मनं कलुषित करून त्यांच्यात अराजकतेचं रोपण करणे, जेणेकरून देशातील संस्थांवरचा त्यांचा विश्वास उडेल आणि देशाच्या एकात्मतेला धोका निर्माण होईल, हा अर्बन नक्षलवादाचा अर्थ आहे. हेच काम राहूल गांधींच्या माध्यमातून होत आहे," असेही ते म्हणाले.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिदध होतील - काँग्रेस नेते उदित राज यांच्या विधानावर जनतेत संताप

राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिदध होतील - काँग्रेस नेते उदित राज यांच्या विधानावर जनतेत संताप

दिल्ली येथे काँगे्रसचे भागीदारी न्याय महासम्मेलन सुरू आहे. या संमेलनामध्ये काँग्रेसचे नेते यांनी राहुल गांधींची तुलना थेट महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी केली आहे. इतर मागासवर्गिय समाजाने राहुल गांधी यांचे एकावे त्यांना पाठिंबा द्यावा. मागासवर्बिय समाजाने तसे केले तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील असे उदित राज म्हणाले.इतर मागासवर्गिय समाजाला राहुल गांधीच्या समर्थनासाठी आवाहन करताना उदित राज यांनी राहुल गांधींना दुसरे डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणून सिद्ध होतील हे म्हंटले. त्यामुळे समाजात रोष पसरला ..

तृतीयपंथी नागरिकांना ओळखपत्र देण्यामध्ये महाराष्ट्र राज्य प्रथम क्रमांकावर

तृतीयपंथी नागरिकांना ओळखपत्र देण्यामध्ये महाराष्ट्र राज्य प्रथम क्रमांकावर

तृतीयपंथी नागरिकांना ओळखपत्र देण्यामध्ये महाराष्ट्र राज्य प्रथम क्रमांकावर आहे. तृतीयंपथीयांच्या हक्कांचे संरक्षण अधिनियम २०१९ मधील नियम २०२० अंतर्गत विभाग सहा आणि सात नुसार जिल्हास्तरीय समितीद्वारे तृतीयपंथीयांना त्यांचे ओळख प्रमाणपत्र, ओळखपत्र देण्यात येत आहे. तृतीयपंथी नागरिकांना ‘नॅशनल पोर्टल फॉर ट्रान्सजेंडर पर्सन’ या केंद्र शासनाच्या पोर्टलद्वारे तृतीयपंथी असल्याचे प्रमाणपत्र आणि ओळखपत्र उपलब्ध करून देण्याची योजना आहे. त्या अंतर्गत. आतापर्यंत राज्यातून ४,४११ ओळखपत्रे दिली आहेत. महाराष्ट्रानंतर दुसरा ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121