विरोधी पक्षनेता ठरवण्यासाठी मविआची खलबतं! संजय शिरसाटांचा खोचक टोला

    22-Nov-2024
Total Views | 40
 
Sanjay Shirsat
 
मुंबई : विरोधी पक्षनेता ठरवण्यासाठी महाविकास आघाडीची खलबते सुरु आहेत, असा खोचक टोला शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी लगावला आहे. विधानसभा निवडणूकीसाठी मतदान पार पडल्यानंतर मविआतील बैठकांना वेग आला आहे. यावर शिरसाटांनी टीका केली.
 
संजय शिरसाट म्हणाले की, "एक्झिट पोलच्या सर्व अंदाजांमध्ये महाविकास आघाडीला स्थान नाही. महायूतीच सत्तेत येणार हे चित्र स्पष्ट झाले आहे. त्यामुळे मविआची हॉटेलमधील बैठक, त्यानंतर शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची भेट ही सगळी धावपळ विरोधी पक्षनेता कोण होणार? यासाठी सुरु आहे. केवळ ४८ तासांमध्ये त्यांच्याकडून हे सगळे होणे शक्य नाही. त्यामुळे महायूतीची सत्ता येणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे. मुख्यमंत्री कोण होणार हे वरिष्ठ नेते ठरवतील आणि २५ तारखेला याबाबतची घोषणा होईल. महाविकास आघाडी कमकुवत झाली असल्याने महायूतीचाच मुख्यमंत्री होणार, हे निश्चित आहे," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
 
हे वाचलंत का? -  नाना पटोले मुख्यमंत्री होणार हे स्वप्नच राहणार! अशोक चव्हाण यांची टीका
 
शरद पवारांच्या भूमिकेबाबत संभ्रम!
 
ते पुढे म्हणाले की, "आम्ही शरद पवारांसोबत जाण्याचा प्रश्नच नाही. उलट शरद पवार कुठे जातील हा मोठा प्रश्न आहे. ते महाविकास आघाडीमध्ये राहतील असे कोणीही छातीठोकपणे सांगू शकत नाही. त्यामुळे त्यांच्या भूमिकेवर पक्षातील कार्यकर्ते, नेते आणि उबाठा गटालादेखील संशय आहे. शरद पवार काहीही करु शकतात. मागच्या वेळी २०१४ ला त्यांनी भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्यामुळे त्यांच्या भूमिकेबाबत आज कुणीही ठामपणे सांगू शकत नाही. आम्ही कुठेही जाणार नाही. आमची महायूती मजबूत आहे. फेविकॉलचा जोड आहे. यूतीमध्ये कुणालाही सामील करुन घेण्याचा अधिकार वरिष्ठ नेत्यांना आहे. ते योग्य तो निर्णय घेतील," असेही ते म्हणाले.
 
राऊत आघाडीत बिघाडी करतील!
 
"संजय राऊतच महाविकास आघाडीत बिघाडी करतील. ते एकत्र राहणार नाहीत आणि यात भीष्माचार्याची भूमिका घेतलेले शरद पवार योग्य वेळी योग्य निर्णय घेतील अशी अपेक्षा आहे. या सगळ्यात उबाठा गट कुठेही दिसत नाही. काँग्रेसवाले आपली स्वतंत्र चूल मांडण्याच्या तयारीत आहेत. काहीही झालं तरी विरोधी पक्षनेतेपद त्यांच्याकडे जाणार हे त्यांना माहिती आहे. त्यामुळे ते निश्चिंत आहेत. बाकीच्यांनी काय करायचे हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे," अशी टीकाही संजय शिरसाटांनी केली आहे.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
वसईत योगेश्वर भावकृषी लागवडीसाठी शेतात स्वाध्यायींचा भक्तिमय भावार्थ , बालसंस्कार केंद्रातील मुलेही रमली चिखलात

वसईत योगेश्वर भावकृषी लागवडीसाठी शेतात स्वाध्यायींचा भक्तिमय भावार्थ , बालसंस्कार केंद्रातील मुलेही रमली चिखलात

परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले प्रेरित स्वाध्याच्या अनेक प्रयोगातील योगेश्वर भावकृषिचा प्रयोग म्हणजे ईश्वराच्या भक्ती बरोबर सर्वांनी मिळून सामाजिकता जपण्याचे भान ठेवणारा अनोखा प्रयोग . याप्रमाणे वसई तालुक्यातील अनेक गावांत सद्ध्या योगेश्वर भावकृषि लागवड सुरू असून स्वाध्यायींचा श्रमभक्तिमय भावार्थ यातून दिसून येतो.वसई पूर्वेतील एका गावात अश्याच प्रकारच्या भावार्थाने स्वाध्यायीं भातशेती लागवडीसाठी रविवारी कृषिवर एकत्र आले होते.यामध्ये बालसंस्कार केंद्रातील मुलेही समाविष्ट झाली होती.यावेळी मुलांची ..

वंशावळीतून वगळणे ही फसवणूकच; सर्वोच्च न्यायालयाचा बहिणींना दिलासा

वंशावळीतून वगळणे ही फसवणूकच; सर्वोच्च न्यायालयाचा बहिणींना दिलासा

बेंगळुरू मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (बीएमआरसीएल) कडून ३३ कोटी रूपयांची भरपाई मिळवण्यासाठी वंशावळ आणि विभाजन करारात खोटेपणा करून पाच बहिणींना संपत्तीतून वगळल्याच्या आरोपावरून सर्वोच्च न्यायालयाने दोन आरोपीविरुद्ध फौजदारी खटला चालवण्याचे निर्देश नुकतेच दिले आहेत. याबाबतीत न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्या. पी.बी. वराले यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले की, “प्रथमदर्शनी पुरावे असे दर्शवतात की संबंधित कागदपत्रे मुद्दाम खोटी तयार करण्यात आली असून, त्याचा उद्देश दिवंगत के. जी. येल्लप्पा रेड्डी यांच्या पाच मुलींना ..

कल्याणच्या एपीएमसी मार्केट संचालकावर राजीनामा देण्याची आली वेळ - प्रशासकाच्या मनमानी कारभारा विरोधात संचालकांचा संताप

कल्याणच्या एपीएमसी मार्केट संचालकावर राजीनामा देण्याची आली वेळ - प्रशासकाच्या मनमानी कारभारा विरोधात संचालकांचा संताप

कल्याणच्या एपीएमसी मार्केटमधील भूखंड लक्ष्मी मार्केट व्यापारी संघटनेला दिल्यानंतर एपीएमसीमधील संचालक प्रशासकावर चांगलेच संतापले आहे. हा भूखंड नियमबाह्य पद्धतीने दिला गेला असल्याचा आरोप करीत आमच्या संचालकांच्या चालत नाही तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जाऊन राजीनामा देण्याचे विधान केल्याने राजकीय वर्तूळात एकच खळबळ उडाली आहे. लक्ष्मी मार्केटच व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. घेतलेला भूखंड हा कायदेशीर आहे. एपीएमसीमधील काही लोक आर्थिक फायद्यासाठी हे सगळे करीत आहे. या वादामुळे एपीएमसी व्यापारी ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121