यतो धर्मस्ततो जयः

    20-Nov-2024
Total Views |
Hindu Dharma

आज मतदानाचा दिवस. महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये स्वत:ला पुरोगामी, धर्मनिरपेक्ष म्हणवणार्‍यांची तत्त्वनिष्ठा आज धर्मांधांच्या समोर लाचार झालेली पाहिली आहे. राज्यात धर्माच्या नावाने धर्मांधांनी उच्छाद मांडला असताना, अनेक ‘मी मी’ म्हणवणारे मतांच्या भिकेसाठी धर्मद्रोह करत आहेत. ‘हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा’ हा विचार या राज्याच्या विचारधारेचा पाया आहे आणि काशीचा विश्वेश्वर सोडवा, हा इथल्या राजाचा आदेश. मात्र, हिंदूंमधील अनेक संप्रदाय, पंथ जिथे गुण्यागोविंदाने नांदले, त्या राज्यात आज जातीचे विष कालवण्याचा सुलतानी डाव खेळला जात आहे. याच्या दिमतीला ‘व्होट जिहाद’ आहेच! त्यामुळेच हिंदूंनी मतदान करताना कोणतीही प्रलोभने मनात न ठेवता १०० टक्के निरपेक्ष भावनेने हिंदू म्हणूनच मतदान करावे, असा संदेश अनेक संत, महंत, नामवंत यांनी दिला आहे.

हिंदुंनो, विचार करूनच मतदान करा!

दि. ६ डिसेंबर १९९२ रोजी बाबरी ढाँचा पडल्यानंतर मुंबईत झालेल्या दंगलींवरून उद्धव ठाकरेंनी माफी मागितली. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंनी हिंदूंच्या रक्षणार्थ इस्लामिक कट्टरपंथींविरोधात, दंगेखोरांविरोधात आपल्या शिवसैनिकांना रस्त्यावर उतरवले होते. त्याच दंगेखोरांसमोर बाळासाहेबांचा कुपुत्र माफी मागत आहे. त्यामुळे अशी व्यक्ती कधी हिंदूहितैशी होऊच शकत नाही. हिंदूंना आवाहन आहे की, विचार करूनच मतदान करा!

स्वामी जितेंद्रानंद सरस्वती


मत‘दान’ सत्पात्री असेल याची
काळजी घेणे प्रत्येकाची जबाबदारी

आज देशात जिहादी मानसिकता असलेली देशविघातक शक्ती सक्रिय आहे. असे असताना ४० ते ४५ टक्के मतदान होणे ही दुर्भाग्याची गोष्ट आहे. त्यामुळे हिंदूंनीच काय, तर सार्‍या देशभक्तांनी राष्ट्र टिकवण्यासाठी १०० टक्के मतदान केलेच पाहिजे. सनातन संस्कृतीचे, मानवतावादी कार्य करणारे, गोमाता-भारतमातेचे संरक्षण करणार्‍यांनाच मतदान करा. हे प्रत्येकाचे राष्ट्रीय कर्तव्य आहे. आपले मत‘दान’ कुपात्री न जाता, सत्पात्री गेले पाहिजे, याची काळजी घेणे प्रत्येकाची जबाबदारी आहे.

स्वामी भारतानंद सरस्वती महाराज


सामाजिक परिस्थिती सुजलाम्, सुफलाम् राहण्यासाठी मतदान करा

या लोकशाहीच्या सर्वोच्च उत्सवात सहभागी होणे, हे प्रत्येक नागरिकाचे आद्य कर्तव्य आहे. आपले भविष्य, आपली पिढी, आपल्या अवतीभोवतीची सामाजिक परिस्थिती कायम सुजलाम् सुफलाम् असली पाहिजे आणि त्यासाठी शतप्रतिशत मतदान करणे आवश्यक आहे. त्यामुळे ‘भारतीय कर्तव्य संहिते’अंतर्गत प्रत्येक नागरिकाने विचार करून मतदान करणे महत्त्वाचे आहे.

महंत आचार्य पीठाधीश्वर डॉ. अनिकेतशास्त्री देशपांडे


सर्व हिंदूंनी सजग राहून पवित्र मतदानाचे कार्य करा

मतदानाने आपल्या अपेक्षेप्रमाणे माणूस निवडता येतो, हे लक्षात घेतले की त्या दृष्टीने आपल्या धर्माचे, देवस्थानाचे, गोमातेचे संरक्षण होणे, आई-बहिणींची अब्रू सुरक्षित राखणारे राज्यकर्ते येणे महत्त्वाचे आहे. त्यादृष्टीने आपण धर्माला अनुकूल असतील, अशा लोकांच्या पदरी जर आपले पवित्र मतदान दिले आणि सगळ्यांनी आपल्या मतदानाचा हक्क जागरुकतेने बजावला, तर ती गोष्ट फार महत्त्वाची ठरेल. यासाठी सर्व हिंदूंनी सजग असायला हवे.

श्रीगुरू चंद्रशेखर महाराज देगलूरकर


हिंदूहिताचा विचार करून मतदान करावे

हिंदूहित हेच देशहित आहे. म्हणून हिंदूहिताचा विचार करूनच मतदान केले पाहिजे. हिंदूहित निर्माण करणारे नीतीनिर्धारक सत्तेमध्ये बसतात. त्यामुळे त्यांनी हिंदूहिताचीच धोरणे बनवली पाहिजेत. याकरिता हिंदूहितावर विश्वास ठेवणारे लोक सत्तेत बसवले पाहिजेत. सगळ्यांनी हिंदूहिताचा विचार करून १०० टक्के मतदान करावे. मतदान केवळ अधिकार नाही, तर प्रत्येकाचे कर्तव्यही आहे. म्हणून कोणीही सुटी घेऊन मतदान टाळू नये. आपल्या घरच्या सगळ्यांना मतदान करण्यास प्रोत्साहन द्यावे, ते घडवून आणावे. आपल्या प्रभावक्षेत्रातील सर्वांना मतदानासाठी आवाहन करावे.

मिलिंद परांडे, केंद्रीय संघटन महामंत्री, विश्व हिंदू परिषद


घुसखोरी, धर्मांतरणाविरोधात कडक कायदे करतील त्यांनाच मत देणे गरजेच

महाराष्ट्राची डेमोग्राफी मोठ्या वेगाने बदलत आहे. राज्यात एक असा जिल्हा राहिला नसेल जिथे अवैध घुसखोरी, धर्मांतरणासारख्या गोष्टी घडल्या नाहीत. महाराष्ट्र सनातन धर्म वाचवण्याची लढाई छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून लढत आला आहे. त्यामुळे सुनियोजितपणे महाराष्ट्राची डेमोग्राफी आज बदलली जातेय. म्हणून त्यांनाच मत देणे गरजेचे आहे, जे अशा घुसखोरी, धर्मांतरणाविरोधात कडक कायदे करतील. लोकसंख्या नियंत्रण कायदा आणतील.

अ‍ॅड. अश्विनी कुमार उपाध्याय, वरिष्ठ अधिवक्ता, सर्वोच्च न्यायालय


विदेशी ताकदीसमोर सकल हिंदू समाजाला संघटित व्हावंच लागेल

भूतकाळात वावरणारा समाज वर्तमानकाळ विसरतो आणि भविष्यकाळ अंधार करून टाकतो. तेव्हा, सावध व्हा! ‘लॅण्ड जिहाद’, ‘लव्ह जिहाद’ आणि आता ‘व्होट जिहाद’ यामागे प्रचंड मोठी विदेशी ताकद आहे. हे पाहता सकल हिंदू समाजाला संघटित व्हावंच लागेल. ‘व्होट जिहाद’ला उत्तर ‘व्होट महादेव’ने द्यावे लागेल. याकरिता १०० टक्के मतदान आवश्यक आहे.

डॉ. उदय निरगुडकर, ज्येष्ठ संपादक,
राजकीय-सामाजिक विश्लेषक, व्याख्याते


आयाबहिणींच्या कपाळावर कुंकू टिकावं असं वाटत असेल, तर १०० टक्के हिंदू मतदान!

गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळी यांसारखे सर्व हिंदू सण आपल्या पुढच्या पिढ्यांना उत्तम प्रकारे साजरे करता यावे, असे वाटत असेल तर लोकशाहीची दिवाळी म्हणजेच मतदान ही हिंदूहिताचा विचार करून साजरी करावी लागेल. देव, देश, धर्म टिकावा असे वाटत असेल, आपल्या आयाबहिणींच्या कपाळावर कुंकू टिकावं असं वाटत असेल, तर एकच पर्याय... १०० टक्के हिंदू मतदान!

राहुल सोलापूरकर, प्रसिद्ध अभिनेते


देव, देश, धर्म आणि संस्कृतीसाठी काम करण्यार्‍यांसाठी सर्वस्वाचाही त्याग करू

आमचा देश, देव, संस्कृती गोमाता यांचे रक्षण आणि सन्मान कारणारे सत्तापदी हवे आहेत; कत्तलखाना उघडणारे सत्ताधीश नको. आम्हाला आमच्या सण-उत्सवांचे संरक्षण करणारीच माणसे हवी आहेत. आमच्या अध्यात्मिक कार्यात अडथळा आणणारी माणसे सत्तेत नकोत. कारण, आमच्या मंदिरांचेच पैसे सरकार खात्यात जमा होतात, चर्च किंवा मशिदीचा पैसा सरकार घेत नाही. आमच्या देवस्थानाच्या जमिनी कोणत्याही कामासाठी चालतात, मात्र ‘वक्फ बोर्डा’ची जमीन कोणत्याही कारणासाठी घेऊ शकत नाही. म्हणून देवस्थानाच्या जमिनी सुरक्षित ठेवणारी माणसे सत्तेत हवी आहेत. संख्याबळाच्या जोरावर एकगठ्ठा मतदान होताना आपण पाहिले आहे. मग, संख्येच्या बाबतीत हिंदू काही कमी आहेत का? आम्ही कोणाच्या विरोधात नाही तसेच बरोबरही नाही. आमची संस्कृती, धर्म जीवनपद्धती वाचवण्यासाठी जे कोणी आमच्याबरोबर आहेत, त्यांच्यासाठी आम्ही सर्वस्वाचाही त्याग करू

प. पू. श्री काडसिद्धेश्वर महाराज


हिंदूंनी आपापसांतील मतभेद विसरून सनातन संस्कृतीच्या रक्षणार्थ १०० टक्के मतदान करावे

हिंदूंनी सर्वप्रथम एकत्रित राहून आपापसांतील मतभेद विसरून जावे. कारण, धर्म हे सर्वस्व आहे. सनातन संस्कृती ही जगाचा विचार करणारी संस्कृती आहे. ज्या संस्कृतीचा आदर्श सार्‍या जगाने घ्यावा, तीच आज धोक्यात आली आहे. त्यामुळे सनातन संस्कृतीच्या रक्षणार्थ १०० टक्के मतदान आवश्यक आहे.

महंत रामगिरी महाराज


देव, देश, धर्म, संस्कृती यांच्या रक्षणासाठी मतदान करा

विठ्ठल बिरदेवाच्या नावाने चांगभलं! महाराष्ट्रातील अठरापगड जातींतील विठ्ठल बिरदेवाच्या लाखो भक्तांना मी आवाहन करतो की, दि. २० नोव्हेंबर रोजीच्या मतदानामध्ये सक्रिय सहभाग घ्या, सर्वांनी मतदान करा. आपल्या देव, देश आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी सर्व हिंदू बांधवांनी सजग राहून, धर्म आणि राष्ट्रहितासाठी मतदान करावे. आज आपण गाफील राहिलो, तर धर्मावर आणि संस्कृतीवर होणारे छुपे हल्ले उघडपणे होतील. मात्र तेव्हा वेळ गेलेली असेल. त्यामुळे सर्वांनी देव, देश आणि धर्म, संस्कृती यांच्या रक्षणासाठी मतदानाचे आवाहन करतो.

फरांडे महाराज, गादी प्रमुख विठ्ठल बिरदेव संस्थान