पश्चीम बंगाल मध्ये 'टॅब स्कॅम'! विद्यार्थांचे पैसे लंपास

    16-Nov-2024
Total Views | 15

tab scam
 
 
कोलकता : पश्चिम बंगाल मध्ये सध्या एका वेगळ्याच घोटाळ्याने सगळ्यांचे लक्ष्य वेधून घेतले आहे. विद्यार्थांना, उच्च शिक्षणासाठी देण्यात आलेल्या टॅबलेटच्या पैशांमध्ये फेरफार होत असून विद्यार्थांच्या बँक खात्याऐवजी वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये हे पैसे जमा होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या संदर्भात कोलकाता पोलीस आणि विशेष तपास पथकाने वेगवेगळ्या ठिकाणी तपास केला असून वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे.

पश्चिम बंगालच्या 'तरुणर स्वप्नो' योजने संबंधित सायबर घोटाळाला उघडकीस आला आहे यामध्ये १० व १२ वीच्या विद्यार्थ्यांना टॅबलेट खरेदीसाठी १०,००० हजार रूपये दिले गेले होते. सदर रकम बँक खात्यात जमा करण्यासाठी एका विशिष्ठ पोर्टल वर बँक खात्याचा नंबर अपलोड करावा लागत असे. हाच नंबर हेरून काही जणांनी हा घोटाळा केला. यामुळेच १६ लाख लाभार्थ्यांपैकी १,९११ विद्यार्थीांना लक्ष्य केले गेले आहे. पश्चिम बंगाल पोलिसांनी या फसवणुकीप्रकरणी ९३ एफआयआर नोंदवले असून आता पर्यंत, ११ जणांना अटक केली आहे. कोलकाता येथे नोंदवलेल्या तक्रारींच्या तपासणीत असे आढळून आले की, बहुतेक प्रकरणांमध्ये, चोप्रा, इस्लामपूर आणि आसपासच्या भागातील रहिवाशांच्या बँक खात्यात पैसे गेले.

सायबर घोटाळ्यांमधला हा एक धक्कादायक प्रकार लोकांच्या समोर आला आहे. पूर्वी मध्यस्थांच्या माध्यमातून पैश्यांमध्ये जो फेरफार होत असे त्याला रोखण्यासाठी म्हणून थेट बँकांमध्ये पैसे पाठवण्याची योजना आखली गेली आहे. परंतु ममता दिदींच्या सरकार मध्ये यामध्ये देखील घोटाळा होत असेल तर ही चिंतेची बाब असल्याचे म्हटले जादत आहे.


 
अग्रलेख
जरुर वाचा
महिला सक्षमीकरणातूनच राष्ट्राची उन्नती : सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत , सोलापूरात उद्योगवर्धिनी संस्थेचा

महिला सक्षमीकरणातूनच राष्ट्राची उन्नती : सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत , सोलापूरात उद्योगवर्धिनी संस्थेचा 'परिवार उत्सव' कार्यक्रम संपन्न

"वात्सल्याचे वरदान असलेल्या मातृशक्तीत समाजाच्या उद्धाराचा विचार स्वाभाविकपणे असतो. त्यामुळेच ही शक्ती उभी राहील्यानंतर राष्ट्राची उन्नती झाल्याशिवाय राहणार नाही", असा विश्वास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी व्यक्त केला. महिला सक्षमीकरणासाठी कार्यरत असलेल्या उद्योगवर्धिनी संस्थेच्या २१ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून हुतात्मा स्मृती मंदिर, सोलापूर येथे गुरुवार, दि. १७ जुलै रोजी 'परिवार उत्सव' कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव एनएफडीसी - नॅशनल म्युझियम ऑफ इंडियन सिनेमा येथे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव एनएफडीसी - नॅशनल म्युझियम ऑफ इंडियन सिनेमा येथे 'भारत पॅव्हेलियन'चे करणार उद्घाटन

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय माहिती व प्रसारण, रेल्वे, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव येत्या १८ जुलै २०२५ रोजी मुंबईतील एनएफडीसी कॉम्प्लेक्समधील नॅशनल म्युझियम ऑफ इंडियन सिनेमा (NMIC) येथील गुलशन महलमध्ये भारत पॅव्हेलियनचे उद्घाटन करणार आहेत. यावेळी महाराष्ट्राचे माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, महाराष्ट्र सरकारचे मुख्य सचिव राजेश कुमार मीणा आणि माहिती व प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत. कथाकथनाची..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121