अक्षय कुमारने अयोध्येसाठी केलं ‘हे’ काम, ‘खिलाडी’चं होतंय कौतुक!

    01-Nov-2024
Total Views | 76
 
ayodhya
 
 
मुंबई : अभिनेता अक्षय कुमार त्याच्या दमदार अभिनयासाठी प्रसिद्ध आहे. नुकताच तो स्त्री २ चित्रपटात झळकला होता. एकीकडे त्याची चित्रपटांची कारकिर्द सुरु आहे तर दुसरीकडे अयोध्येसाठी अक्षय कुमारने एक कोटी दिले आहेत. पण नेमकी इतकी मोठी रक्कम का दान केली याच कारण जाणून घेऊयात..
 
अक्षय कुमारने अयोध्येतील माकडांना अन्न पुरवणाऱ्या ट्रस्टला देणगी देण्याचा निर्णय घेतला आहे. जगतगुरु स्वामी राघवाचार्य जी महाराज यांच्या नेतृत्वाखालील अंजनेय सेवा ट्रस्ट यासाठी पुढाकार घेत असून अक्षयने या ट्रस्टला १ कोटी रुपयांची देणगी देण्याचा निर्णय घेतला आहे. जेणेकरुन अयोध्येत दररोज जास्तीत जास्त माकडांना खाद्य देता येईल.
 
अक्षय कुमारच्या या देणगीबद्दल अंजनेय सेवा ट्रस्टच्या संस्थापक विश्वस्त प्रिया गुप्ता म्हणाल्या की, ‘मी अक्षय कुमारला नेहमीच एक अतिशय दयाळू आणि उदार व्यक्ती म्हणून ओळखते. त्याच्या टीम आणि स्टाफ व्यतिरिक्त तो नेहमी त्याच्या सहकलाकारांना कुटुंबाप्रमाणे वागवतो. त्यांनी केवळ १ कोटी रुपयांची देणगीच दिली नाही तर ही सेवा त्याचे आई-वडील आणि सासरच्या लोकांनाही समर्पित केली आहे.
 
पुढे त्या म्हणाल्या की, ‘अक्षय कुमार भारताचा एक जागरूक नागरिक देखील आहे. त्यांना अयोध्या आणि शहरातील नागरिकांची काळजी होती आणि माकडांना खायला घालताना कोणत्याही नागरिकाची गैरसोय होणार नाही याची काळजी आम्ही घेऊ. सोबतच हे उदात्त कार्य करत असताना अयोध्येच्या रस्त्यांवर कोणत्याही प्रकारे अस्वच्छता होता कामा नये’. असे त्यांनी सांगितले.
 
दरम्यान, आगामी काळात अक्षय कुमार ‘वेलकम टू द जंगल’, ‘हेरा फेरी ३’, ‘जॉली एलएलबी ४’, ‘हाऊसफुल ५’ आणि ‘भूत बंगला’ या चित्रपटात तो झळकणार असे सांगितले जात आहे. शिवाय ‘सिंघम अगेन’मध्येही तो कॅमिओ करणार आहे.
अग्रलेख
जरुर वाचा
महावितरणचा २० वा वर्धापन दिन भांडुप परिमंडलात उत्साहाने साजरा

महावितरणचा २० वा वर्धापन दिन भांडुप परिमंडलात उत्साहाने साजरा

ग्राहकांना चांगली सेवा देण्यासाठी व शेवटच्या ग्राहकापर्यंत वीज पुरवठा करण्यासाठी सक्षम वीज वितरण यंत्रणा उभारण्याचा व त्याची देखभाल करण्यासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे विलगीकरण करुन २००५ साली महानिर्मिती, महापारेषण व महावितरण कंपनी निर्माण करण्यात आल्या. दि. ६ जून २०२५ रोजी महावितरणच्या २० वा वर्धापन दिनानिमित्त भांडुप परिमंडल व ठाणे मंडळ कार्यालयाचे कार्यक्रम ठाणे येथील काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष भांडुप परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री.संजय पाटील सोबत ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121