जस्टिन ट्रूडो हे खलिस्तान्यांचे पोशिंदे! कॅप्टन अमरिंदर सिंह यांचा घणाघात
25-Oct-2024
Total Views | 40
नवी दिल्ली :(India Canada Relations)भारत आणि कॅनडा यांच्यातील झालेल्या बेबनावाला पूर्णपणे जस्टिन ट्रूडो जबाबदार असून, ट्रूडो हे खलिस्तानी प्रोपोगंडाचा प्रचार करत आहेत असे जाहीर विधान पंजाबचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी केले आहे. ट्रूडो यांना केवळ शीखांची मतं मिळवायची असून, जाणीवपूर्वक खलिस्तानी लोकांना फूस लावली जात आहे.
कॅप्टन अमरिंदर सिंह म्हणाले ज्या वेळेस मी सत्तेत होतो त्या वेळेस मी ट्रूडो यांना भेटलो नाही. मतांच्या राजकारणासाठी आणि सत्ता काबीज करण्यासाठीच ट्रूडो यांनी भारताबरोबरचे संबंध बिघडवले असे मत कॅप्टन यांनी व्यक्त केले. भारत आणि कॅनडा यांच्यातील वादाचे रूपांतर संघर्षात झाल्याच्या वेळेस सिंह यांनी हे वक्तव्यं केले आहे. हरदीप सिंह निज्जर याची हत्या झाल्यानंतर,कॅनडाच्या पंतप्रधानांनी कारण नसताना भारताला यात गोवण्याचा प्रयत्न केला. ट्रूडो यांच्या सरकारने भारतीय दूतवासांचा अपमान सुद्धा केला. यामुळेच भारतीय सरकारने उच्चायुक्तांना मायदेशी परत बोलवले.
ट्रूडो यांची खुर्ची जाणार ?
भारताबरोबर राजनैतिक संबंध न टिकवता आल्यामुळे जस्टिन ट्रूडो यांना त्यांच्याच पक्षातील नेत्यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यायला सांगितला आहे. निवडणुकीसाठी ट्रुडो हे खलिस्तानी फुटीरतावाद्यांना सर्मथन देत असल्याचा आरोप त्यांच्यावर केला जातो आहे. बंद दाराआड झालेल्या चर्चेत ट्रूडो यांच्या पक्षातील लोकांनी त्यांना सत्तेची खुर्ची रिकामी करायाला गितली. तसेच, त्यांनी पुढची निवडणूक लढवू नये असे सुद्धा सांगितले. माध्यामांना मिळालेल्या माहितीनुसार कॅनडामध्ये आता ट्रूडो यांच्या लोकप्रियतेला उतरती कळा लागली आहे, याचा फटका लिब्रल पक्षाला येत्या निवडणूकीत बसण्याची शक्यता आहे. तणावपूर्वक परिस्थीती असताना सुद्धा जस्टिन ट्रूडो यांनी त्यांच्या पक्षात सगळं काही अलबेल असल्याचे सांगितलं आहे.