पेटीएमला मोठा दिलासा; मार्गदर्शक तत्वांनुसार नव्या युपीआय युजर्सना एनपीसीआयची मंजूरी!

    23-Oct-2024
Total Views | 30
npci gives permission to paytm new upi users


मुंबई :     नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया(एनपीसीआय)कडून पेटीएमला मोठा दिलासा मिळाला आहे. एनपीसीआयने नवीन युपीआय ​​वापरकर्ते जोडण्यासाठी एनपीसीआयकडून मंजुरी मिळाली आहे. जारी करण्यात आलेल्या एनपीसीआयच्या सर्व प्रक्रियात्मक मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून पेटीएमला मान्यता दिली आहे.


हे वाचलंत का? -     भारताच्या जीडीपी वृध्दीचा दर ७ ते ७.२ टक्के राहील; 'डिलॉईट इंडिया'चा अंदाज


दरम्यान, या सर्व पार्श्वभूमीवर पेटीएमकडून बीएसईला फाईलिंग करण्यात आले आहे. या फाईलिंगच्या माध्यमातून दि. २२ ऑक्टोबरला एनपीसीआयने कंपनीला प्रक्रियात्मक मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचे आदेश जारी केले आहेत. तसेच, नव्या युपीआय वापरकर्त्यांना जोडण्यासाठी परवानगी दिली आहे, असे पेटीएमने म्हटले आहे.

विशेष म्हणजे यासोबतच कंपनीने एनपीसीआयकडून जारी करण्यात आलेले मंजूरी पत्र देखील जोडले आहे. पत्रानुसार, ही मंजुरी एनपीसीआयद्वारे वेळोवेळी जारी केलेल्या सर्व प्रक्रियात्मक मार्गदर्शक तत्त्वांचे आणि परिपत्रकांचे पालन करण्याच्या अधीन आहे, विशेषत: जोखीम व्यवस्थापन, ॲप आणि 'क्यूआर'साठी ब्रँड मार्गदर्शक तत्त्वे, मल्टी-बँक मार्गदर्शक तत्त्वे, टीपीएपी मार्केट शेअर आणि मार्गदर्शक तत्त्वे आणि परिपत्रके यांचा समावेश आहे.
 




अग्रलेख
जरुर वाचा
लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

संत गाडगे महाराज विचार मंच महाराष्ट्र राज्य आणि ज्ञानज्योत फाऊंडेशन महाराष्ट्र यांच्या वतीने देण्यात येणारा ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ या वर्षी लेखक, साहित्यिक जयेश मेस्त्री यांना प्राप्त झाला आहे. दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील साहित्य क्षेत्रात उत्तम कामगिरी करणार्‍या साहित्यिकांचा गौरव करण्यात आला. दिनांक ०७ जून २०२५ रोजी पुणे येथील सदाशिव पेठेतील वेदशास्त्रोत्तेजक सभागृह येथे हा सुंदर सोहळा पार पडला. या प्रसंगी प्रसिद्ध उद्योजक डॉ. रामदास कुटे हे उद्घाटक म्हणून उपस्थित होते. तसेच ..

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

: मराठी साहित्यातील प्रतिष्ठीत मानल्या जाणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनचा ९९ व्या सोहळा आगामी वर्षात साताऱ्यात पार पडणार आहे. ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजन करण्याचा मान साताऱ्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेला आणि मावळा फौंडेशनला मिळणार आहे.अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पुणे येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी, उपाध्यक्ष गुरुय्या स्वामी, कार्यवाह सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121