योग्य गुणांसह व्यक्तिमत्त्व घडवणे हा समितीच्या शाखेचा उद्देश असला पाहिजे

माननीय शांताक्का यांचे प्रतिपादन

    22-Oct-2024
Total Views | 52

Mananiya Shantakka Jaipur

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Mananiya Shantakka Jaipur)
"सर्वांशी मैत्रीपूर्ण वृत्ती ठेवून आपल्या क्षमतेनुसार आणि बुद्धिमत्तेनुसार आनंदाने व दृढनिश्चयाने कार्य केले पाहिजे. आपले घर, समाज आणि राष्ट्र चालवायचे असेल तर बुद्धिमत्ता, पैसा आणि मसल पॉवर या तिन्ही शक्तींची गरज आहे. तिन्ही चांगल्या माणसाच्या हातात असतील तर कामाला योग्य दिशा मिळते आणि वाईट माणसाच्या हातात असेल तर दहशतवाद वाढतो आणि महिलांवर अत्याचार होतात. अशाने समाजात अस्थिरता दिसून येते. त्यामुळे योग्य गुणांसह व्यक्तिमत्त्व घडवणे हा आपल्या राष्ट्र सेविका समिती शाखेचा उद्देश असला पाहिजे.", असे प्रतिपादन राष्ट्र सेविका समितीच्या प्रमुख संचालिका माननीय शांताक्का यांनी केले.

हे वाचलंत का? : ध्येयविरहित शिक्षण व्यवस्था देशासाठी घातक! : डॉ. मनमोहन वैद्य

राजस्थान विद्यापीठाच्या क्रीडा मैदान येथे राष्ट्र सेविका समिती जयपूर विभागाच्या वतीने गालव, मालवीय, विद्याधरनगर आणि मानसरोवर जिल्ह्याच्या शाखा संगम कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. त्यावेळी त्या बोलत होत्या. यादरम्यान मैदानावर जयपूर विभागाच्या १२ शाखा लावण्यात आल्या. प्रत्येक शाखेत एक-एक तासांचे कार्यक्रम घेण्यात आले.

उपस्थितांना संबोधत शांताक्का पुढे म्हणाल्या, "जीवनात सखोल आणि गहन साधना करण्यासाठी एक तास शाखा हे मूलभूत साधन आहे. यातून व्यक्तिमत्त्व घडत असते. आपला गणवेश हीच आपली ओळख आहे. जेव्हा सेविका हा शब्द आपल्या मनात येतो तेव्हा आपल्याला वाटते की मी भारतमातेची कन्या आहे, जिच्याकडे उत्कृष्ट इतिहास, परंपरा आणि संस्कृती आहे. म्हणूनच मी हिंदू आहे, ज्याला जगभरात मान मिळत आहे."

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121