आचारसंहिता भंगाच्या ४२० तक्रारी प्राप्त

४१४ निकाली; १० लाख ६४ हजारांची मालमत्ता जप्त

    19-Oct-2024
Total Views |
 
mcc
 
 
 
मुंबई : ( Model Code of Conduct ) विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता दि. १५ ऑक्टोबरपासून लागू झाली आहे. दि. १५ ते १८ ऑक्टोबरपर्यंत राज्यभरात सी-व्हिजिल ॲपवर आचारसंहिता भंगाच्या एकूण ४२० तक्रारी प्राप्त झाल्या असून, त्यापैकी ४१४ तक्रारी निवडणूक आयोगाकडून निकाली काढण्यात आल्या आहेत. यापैकी १०० मिनिटांत २५६ तक्रारींचा निपटारा करण्यात आल्या आहे. राज्यात सर्वात जास्त ठाणे जिल्ह्यातील तक्रारींचे निवारण करण्यात आले आहे.
 
विधानसभा निवडणुकीसाठीची आदर्श आचारसंहिता लागू झाल्यापासून राज्य शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे करण्यात आलेल्या बेकायदा पैसे, दारू, ड्रग्ज व मौल्यवान धातू इत्यादी बाबतीत १० लाख ६४ हजारांची मालमत्ता जप्त करण्यात आल्याची माहिती निवडणूक आयोगातर्फे देण्यात आली.