सर्वसामान्यांच्या कल्याणाकरिता केंद्र सरकारकडून योजना; अंतरिम बजेटकडे देशाचे लक्ष

    31-Jan-2024
Total Views | 42
Government of India Various Schemes for Citizens
 
नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून देशातील युवा आणि सर्वसामान्य, गरीबांना केंद्रस्थानी ठेवून योजना राबविण्यात येत आहेत. अर्थसंकल्पीय अधिवेशनात अंतरिम बजेट अर्थमंत्री निर्मला सीतारामण सादर करणार आहेत. अंतरिम बजेट सादर करण्याच्या पार्श्वभूमीवर अर्थमंत्री म्हणाल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात देशातील चार प्रमुख घटकांकरिता म्हणजेच तरुण, महिला, शेतकरी आणि गरीब यांच्या विकासासाठी सरकारकडून धोरणात्मक निर्णय घेण्यात येत आहेत.

त्या पुढे म्हणाल्या, उदाहरणादाखल देशातील लाखो शेतकऱ्यांसाठी आधुनिक व नैसर्गिक प्रकारांबाबत सांगण्यात येत असून ज्यामुळे शेतकऱ्यांच्या खर्चात घट येईल. सर्वसामान्यांना घर, पाणी, वीज, रस्ता यांसारख्या पायाभूत सुविधा सरकारकडून उपलब्ध करण्यात येत आहेत. तसेच, विविध योजनांच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे स्वप्न पूर्ण करण्यात येईल. त्याचबरोबर, देश, लाल समुद्रातील राजनैतिक संघर्ष यांमुळे जग महागाईसारख्या प्रश्नांना सामोरे जात असताना भारताला याची झळ बसलेली नाही, असे अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी यावेळी सांगितले.


अग्रलेख
जरुर वाचा
लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

संत गाडगे महाराज विचार मंच महाराष्ट्र राज्य आणि ज्ञानज्योत फाऊंडेशन महाराष्ट्र यांच्या वतीने देण्यात येणारा ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ या वर्षी लेखक, साहित्यिक जयेश मेस्त्री यांना प्राप्त झाला आहे. दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील साहित्य क्षेत्रात उत्तम कामगिरी करणार्‍या साहित्यिकांचा गौरव करण्यात आला. दिनांक ०७ जून २०२५ रोजी पुणे येथील सदाशिव पेठेतील वेदशास्त्रोत्तेजक सभागृह येथे हा सुंदर सोहळा पार पडला. या प्रसंगी प्रसिद्ध उद्योजक डॉ. रामदास कुटे हे उद्घाटक म्हणून उपस्थित होते. तसेच ..

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

: मराठी साहित्यातील प्रतिष्ठीत मानल्या जाणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनचा ९९ व्या सोहळा आगामी वर्षात साताऱ्यात पार पडणार आहे. ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजन करण्याचा मान साताऱ्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेला आणि मावळा फौंडेशनला मिळणार आहे.अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पुणे येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी, उपाध्यक्ष गुरुय्या स्वामी, कार्यवाह सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121