लग्न एकदाच होतं!, प्रत्येक ॲनिव्हर्सरीला सर्टिफीकेट दाखवावं लागत नाही! : संजय राऊत

    17-Jan-2024
Total Views | 95

Sanjay Raut


मुंबई :
लग्न एकदाच होतं, प्रत्येक ॲनिव्हर्सरीला सर्टिफीकेट दाखवावं लागत नाही, असे वक्तव्य उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे. राज्यात सध्या शिवसेना आमदार अपात्रतेचा मुद्दा चांगलाच चर्चेत असून १० जानेवारी रोजी विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी याप्रकरणी निकाल दिला. या निकालाविरोधात उद्धव ठाकरेंनी रविवारी पत्रकार परिषद घेतली. त्यानंतर सोमवारी सकाळी संजय राऊतांनी माध्यमांशी संवाद साधला.
 
संजय राऊत म्हणाले की, "लग्न एकदाच होतं. प्रत्येक ॲनिव्हर्सरीला सर्टिफीकेट दाखवावं लागत नाही. या तारखेला आमचं लग्न झालेलं आहे म्हणून आम्ही ॲनिव्हर्सरी करतोय असं सांगावं लागत नाही. ४० वर्ष लोक अॅनिव्हर्सरी साजरी करत असतात. पक्षाची घटना एकदाच दिलेली असते. मग त्यात जे बदल होतात ते आपण वेळोवेळी कळवत असतो. शिवसेनेनं वेळोवेळी झालेले बदल कसे कळवले आणि त्याच्या पोचपावत्या रविवारी दाखवल्या," असेही ते म्हणाले.



अग्रलेख
जरुर वाचा
हिंदू समाजाने जागृत होणे अत्यावश्यक: सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

हिंदू समाजाने जागृत होणे अत्यावश्यक: सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्षे पूर्ण होतील. संघाचा जन्म, जन्मापासून करावा लागलेला संघर्ष, विस्तार व आज समाजातील सर्वच क्षेत्रांवर संघाचा पडलेला लक्षणीय प्रभाव, या सार्‍या प्रक्रियांबाबत समाजात, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरही कमालीचे कुतूहल आहे. यांसारख्या विविध विषयांवर ‘ऑर्गनायझर’चे संपादक प्रफुल्ल केतकर, ‘पांचजन्य’चे संपादक हितेश शंकर, सा. ‘विवेक’च्या संपादक अश्विनी मयेकर आणि मल्याळम दैनिक ‘जन्मभूमी’चे सहसंपादक एम. बालकृष्णन यांनी सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्याशी साधलेला हा विशेष संवाद.....

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121