विखारी विचारांची विषपेरणी

    15-Jan-2024
Total Views | 190
  विचारांची
 
काहींचे विचार मुळातच इतके विखारी का असतात? इतरांबद्दलची पराकोटीची नकारात्मकता आणि द्वेषभावना याने साध्य काय होते? अशा विषपेरणी करणार्‍या माणसांना नेमके कसे ओळखावे? त्यांच्यापासून दूर कसे राहावे? त्याचेच हे मनोविश्लेषण...
 
आपल्या आयुष्यातील वाईट लोकांशी आपण कसे वागावे? जगात बरेच विखारी लोक आहेत, जे नकारात्मकता पसरवण्यात धन्यता मानतात. तुमचा तिरस्कार करण्यात, तुमचा अपमान करण्यात, तुमच्याशी वाईट वागण्यात किंवा किमान तुमच्यासाठी वाईट कर्म करण्याची इच्छा बाळगण्यात त्यांना काहीही संकोच नसतो. या विखारी व्यक्ती खूप चिकाटीच्या, क्रूर, दुर्भावनापूर्ण आणि द्वेषपूर्ण असू शकतात आणि ते आपल्या दैनंदिन जीवनाला चांगलेच उद्ध्वस्त करू शकतात. अनेक वेळा ते आपल्याला खच्ची करण्यात यशस्वी होऊ शकतात. ते आपले सहकारी, कुटुंबातील सदस्य, शेजारी, यादृच्छिक अनोळखी लोक किंवा फक्त एक ऑनलाईन ट्रोल असू शकेल.
 
व्यक्तिशः आपण सगळ्यांनी आयुष्यात जास्त वाईट लोकांचा सामना केला आहे. आपण एकतर त्यांच्याशी असभ्य वर्तन करून प्रतिसाद देतो किंवा आपण त्यांच्यापासून दूर जातो. त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो. परंतु, हे नेहमीच तितके सरळ सोपे नसते. कठीण लोकांची नकारात्मक वृत्ती खूप संसर्गजन्य असू शकते आणि ती अजाणता आपल्या मानसिक आणि भावनिक आरोग्यावर सहज परिणाम करू शकते. त्यांच्याशी तर्क करण्याचा प्रयत्न करणे हा एक व्यर्थ प्रयत्न आहे. कारण, ते जाणूनबुजून असे वागतात, जे खूप चक्रावणारे, निराशाजनक आणि कधीकधी भयानकही असू शकते. वस्तुस्थिती अशी आहे की, तुम्ही त्या व्यक्ती कुठल्या थराला जातील, याचा कधीही तर्क बांधू शकत नाही किंवा या अवास्तव विषारी व्यक्तीशी तर्कशुद्धपणे संवादसुद्धा साधू शकत नाही. क्षुद्र प्रवृत्तीचे लोक द्वेष करणारे, गुंड आणि अत्यंत नकारात्मक असतात. पण, ते असे का आहेत? ते आपल्या क्षुद्रतेने जाणीवपूर्वक आपल्या मानसिकतेवर आवश्यकतेपेक्षा जास्त परिणाम का करतात? सर्वांत कठीण आणि क्षुद्र लोक ईर्ष्या, द्वेष आणि कटुतेने पुरेपूरभरलेले असतात आणि ते त्यांच्या संवादातून आणि वागणुकीतून दिसून येत असते. जेव्हा इतरांचे काही वाईट घडते, तेव्हा त्यांना खूप आनंद होतो आणि जेव्हा तुम्ही त्यांच्याकडे नसलेले काहीतरी उत्तम साध्य करण्यात यशस्वी होता, तेव्हा त्यांना तुमच्यात जगभरचे दोष आढळतात. मग ते असे का आहेत बरं? काही लोक अशाच प्रवृत्तीबरोबर जन्माला येतात. तुम्ही अचानक एका प्रभात काळी वाईट व्यक्ती म्हणून उठत नाही. तुमच्या स्वाभिमानाच्या आणि आत्मसन्मानाचा कदाचित हजारो वेळा बळी गेलेला असावा. तुमच्या प्रसन्न व्यक्तिमत्वाला सुरुंग लागलेला असावा.
 
तुम्हाला अशी एखादी व्यक्ती भेटली की जी तुम्हाला इतरांबद्दल नकारात्मक गप्पांच्या किस्से सांगत असेल, तर एक गोष्ट तुम्ही निश्चितपणे सांगू शकता, ते एखाद्या दिवशी तुमच्याबद्दल सुद्धा तशाच प्रकारे बोलतील. गप्पांचे दोन प्रकार आहेत: नकारात्मक आणि सकारात्मक. गप्पाटप्पा किंवा अफवा- तशा स्वतःहून वाईट नाहीत. हा एक संवाद प्रकार आहे. जो माणसांना एकत्र बांधतो. गॉसिप किंवा अफवा ज्या माहितीचा प्रसार करत आहेत, त्यामागील लोकांचा हेतू आपण लक्षात घेतला पाहिजे. समस्या अशी आहे की, नकारात्मक गप्पाटप्पा आणि कंड्या खूप जलद आणि पुढे प्रवास करतात. त्या खर्‍या आहेत की नाही, याची पर्वा न करता समाजमाध्यमांवर वेगाने पसरतात. वैयक्तिकरित्या आपण अशा लोकांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करत असतो. जेव्हा आपल्या भोवती असे लोक नकारात्मक ऊर्जा आणत आहेत असे वाटते, तेव्हा तेव्हा आपण त्यांना एका क्षणात दूर करून टाकणे आवश्यक असते. आपण सर्व माणसं आहोत, त्यामुळे चुका होतात. जे लोक सतत नकारात्मक विचारांना पोसतात किंवा पसरवतात तेव्हा त्यामागे अनेक कारणे असू शकतात. नकारात्मक प्रकारचा गपशप करणे किंवा कंड्या पिकवणे, हे दुर्भावनापूर्ण किंवा अत्यंत असुरक्षित अशा व्यक्तींचे द्योतक आहे.
 
अशा व्यक्ती अत्यंत असुरक्षित आणि मत्सरी आहेत. ते त्यांचे मुद्दे इतर लोकांसमोर सतत थोपत असतात. त्यांनी पसरवलेल्या दुर्भावनापूर्ण गप्पांमुळे ते ज्या व्यक्तीबद्दल बोलत आहेत, त्या व्यक्तीचे जितके नुकसान होते, तितकेच नुकसान त्यांचे स्वतःचे होते. या वस्तुस्थितीबद्दल ते आंधळे आहेत. त्यांचा असा विश्वास असतो की, इतरांबद्दल वाईट बोलल्याने ते त्यांच्या तुलनेत अधिक चांगले दिसतात. त्यांना त्यांच्या स्वत:च्या कमतरतेची भरपाई करण्याची कायम गरज भासते. त्यांचा आत्मसन्मान कमी असतो आणि ते सतत त्यांच्या वागण्याबद्दल बाहेरील प्रमाणीकरण शोधत असतात. थोडक्यात, त्यांना वेळोवेळी टाळ्यांची गरज भासते. त्यांच्यासाठी दिखावा किंवा संपत्तीची प्रशंसा खूप महत्त्वाची आहे. जर एखाद्या व्यक्तीकडे असे काही असेल जे त्यांच्याकडे नाही, तर त्यांना लगेचच त्या व्यक्तीचे अवमूल्यन करण्याची तीव्र गरज भासते. बर्‍याच लोकांना खाली पाडून ते इतर लोकांशी संबंध जोडतात.
 
अनेक माणसे नकारात्मक भावनांच्या आहारी जाऊ शकतात. टीका आणि नकारात्मकता ही त्यांची आयुष्यभराची सवय झाली असावी. कधीकधी हे बुद्धिमत्तेच्या अभावाचे किंवा कंटाळवाणेपणाचे लक्षण असू शकते. एलेनॉर रुझवेल्टला यांचा एक सुप्रसिद्ध वचन आहे - मोठी मने कल्पनांवर चर्चा करतात, मध्यम मने घटनांवर चर्चा करतात, क्षुद्र मने लोकांवर चर्चा करतात. ते खरोखर किती विनाशकारी आहेत, हे त्यांना कळत नाही. त्यांना विवेक नाही. म्हणूनच ते वारंवार वाईट करत राहतात. केवळ चित्रपटांमध्येच अशा लोकांमध्ये हृदयपरिवर्तन घडते. प्रत्यक्षात अशा लोकांमध्ये मात्र बदल होताना दिसत नाही. ते फक्त त्यांच्या फायद्यासाठी काम करतात. थोडक्यात, कोणत्याही प्रकारची माणुसकी किंवा त्यांची मदत मिळेल, हे विसरून जा. खोटे बोलणे हा त्यांचा गाभा असतो, बढाई मारणे यानेच त्यांचा दिवस बनतो!
डॉ. शुभांगी पारकर
अग्रलेख
जरुर वाचा
भारतीय जनता पक्षातर्फे जागतिक योग दिवस कल्याण पश्चिमध्ये उत्साहात साजरा माजी आमदार नरेंद्र पवार 30 हून अधिक ठिकाणच्या कार्यक्रमात सहभागी

भारतीय जनता पक्षातर्फे "जागतिक योग दिवस" कल्याण पश्चिमध्ये उत्साहात साजरा माजी आमदार नरेंद्र पवार 30 हून अधिक ठिकाणच्या कार्यक्रमात सहभागी

निरोगी शरीर आणि स्वस्थ मनाचे महत्त्व संपूर्ण जगाला पटवून देणाऱ्या योग म्हणजेच योगाभ्यासानिमित्त संपूर्ण जगभरात 21 जून हा जागतिक योग दिवस म्हणून साजरा केला जातो. त्याचे निमित्त साधून भारतीय जनता पक्षातर्फे कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील पाचही मंडलांमध्ये जागतिक योग दिवस साजरा करण्यात आला. विशेष म्हणजे भाजपच्या या मंडलांमध्ये झालेल्या 30 हून अधिक कार्यक्रमांमध्ये माजी आमदार नरेंद्र पवार यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतल्याचे दिसून आले...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121