मुंबई : शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी देण्यास सुरुवात केली आहे. १२०० पानांचा निकाल घेऊन अध्यक्ष विधानभवनात पोहोचले आहेत. शिवसेना आमदार अपात्रता निकालाप्रकरणी ठाकरे गटाची घटना दुरूस्ती नियमबाह्य असल्याचे विधानसभाध्यक्ष नार्वेकर यांनी म्हटले आहे. तसेच, ठाकरे गट उलटतपासणीस अनुपस्थित राहिल्याने त्यांचे प्रतिज्ञापत्र रद्द करण्यात आले आहे,
शिवसेनेच्या घटनेनुसार राष्ट्रीय कार्यकारीणीकडे अंतिम अधिकार आहेत. शिवसेना प्रमुख कोणालाही पदावरुन काढू शकत नाहीत. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी घेतलेले निर्णय ग्राह्य धरता येणार नाहीत. अस विधानसभा अध्यक्षांनी म्हटल आहे. उद्धव ठाकरेंनी राष्ट्रीय कार्यकारणीचा पाठींबा नव्हता त्यामुळे एकनाथ शिंदेंना हटवण्याचा निर्णय ते घेऊ शकत नाहीत असही अध्यक्षांनी म्हटल आहे.
भरत गोगावले यांची प्रतोद म्हणुन नियुक्ती योग्यच आहे. आणि त्यांनी काढलेली व्हीपच योग्य आहे असा निकाल विधानसाभा अध्यक्षांनी दिला आहे. शिंदे गट हीच खरी शिवसेना आहे. विधीमंडळ पक्ष ज्याचा असतो त्याचाच मुळ पक्ष असतो. त्यामुळे शिंदेंच्या आमदारांना अपात्र करता येणार नाही असही अध्यक्ष पुढे म्हणाले. त्यामुळे आता शिंदेचा पक्षच मुळ शिवसेना राजकीय पक्ष असणार आहे.