'आदित्य एल १'च्या दुसऱ्या पृथ्वी प्रदक्षिणेला सुरुवात!

    05-Sep-2023
Total Views | 29


ADITYA L1

मुंबई :
भारतासह इतर देशांचे लक्ष लागलेल्या 'आदित्य एल १' मोहिमेचे यशस्वी प्रक्षेपण शनिवारी, सकाळी ११ वाजून ५० मिनिटांनी श्रीहरिकोटाच्या सतीश धवन अवकाश तळावरून झाले. सूर्याभ्यासासाठी निघालेले हे यान १५ दशलक्ष किलोमीटरचा प्रवास करून एल १ पॉइंट पर्यंत पोहचणार आहे.

आज पहाटे २ वाजून ४५ मिनिटांनी आदित्यने दुसरे अर्थ-बाउंड मॅन्यूव्हर म्हणजेच पृथ्वीच्या नव्या कक्षेत प्रवेश केल्याचे इस्रोने ट्विटकरून सांगितले आहे. इस्रो टेलीमेट्री, ट्रॅकिंग आणि कमांड नेटवर्कच्या (ISTRAC) मॉरिशस, बंगळुरू आणि पोर्ट ब्लेअर येथे असलेल्या आयएसटीआरएसीच्या ग्राउंड स्टेशनने या उपग्रहाचा मागोवा घेतला आहे.

ते आता पृथ्वीच्या सर्वात जवळच्या बिंदूवर २८२ किमी आणि पृथ्वीभोवती सर्वात दूर असलेल्या ४०२२५ किमीच्या लंबवर्तुळाकार कक्षेत फिरत आहे. तसेच 'आदित्य एल १' उपग्रह 10 सप्टेंबरला भारतीय वेळेनुसार, दुपारी २ वाजून ३० मिनीटांनी पृथ्वीच्या नव्या कक्षेत प्रवेश करणार असल्याचं इस्रोने सांगितले आहे.

या माहितीनुसार पृथ्वीभोवतीची प्रदक्षिणा पूर्ण करून भारताने मोहिमेच्या दिशेने आणखी एक सकारात्मक पाऊल टाकले आहे.

अग्रलेख
जरुर वाचा
एसटीच्या ताफ्यातील जुन्या बसमुळे प्रवाशांचे हाल ; ३००० नव्या बस खरेदीची प्रक्रिया सुरु; परिवहन मंत्र्यांची माहिती

एसटीच्या ताफ्यातील जुन्या बसमुळे प्रवाशांचे हाल ; ३००० नव्या बस खरेदीची प्रक्रिया सुरु; परिवहन मंत्र्यांची माहिती

राज्याच्या अनेक भागात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडाळाच्या बसेसच्या झालेल्या दूरवस्थेमुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. एस.टी. बसेस बाबत वारंवार नागरिक व लोकप्रतिनिधी यांचेकडून शासनाकडे निवेदन वा तक्रार करुनही नवीन बस खरेदी व बस स्थानकामध्ये सुधारणा करण्याबाबत कोणतीही प्रभावी उपाययोजना व त्याची अंमलबजावणी का करण्यात येत नाही, असा सवाल राज्याच्या विविध भागातील आमदारांनी विधानसभेत तारांकित प्रश्नाद्वारे उपस्थित केला. यावर उत्तर देताना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी बसेसची कमतरता भरुन काढण्यासाठी रा.प. महामंड..

राज्यात बंदरक्षेत्रात १२० कोटींची विदेशी गुंतवणूक

राज्यात बंदरक्षेत्रात १२० कोटींची विदेशी गुंतवणूक

राज्यातील पहिल्या सहा जिल्ह्यांमध्ये आयटीआय संस्थाचे आधुनिकीकरण दरवर्षी ५०००-७००० तरुणांना जागतिक दर्जाचे प्रशिक्षण मिळणार बंदरे आणि लॉजिस्टिक क्षेत्रासाठी कुशल मनुष्यबळ पुरविण्यासाठी कौशल्य विकास विभाग,बंदरे विभाग आणि अटल सॉल्युशेन,एम.डी रुरल ग्रुप यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला. नेदरलँड्स, डेन्मार्क आणि पोलंडमधील विदेशी पतसंस्था सामंजस्य करारातंर्गत १२० कोटी रूपयांची गुंतवणुक करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, बारामती, सिंधुदुर्ग, नागपूर आणि नाशिक मधील सहा निवडक आयटीआय..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121