वरळीत तलावावरून चिखलफेक; भाजप आणि उबाठा गटात नवा वाद

    21-Sep-2023
Total Views |
BJP And UBT Group Political Issue In Worli

मुंबई :
मुंबईतील राजकीय वादाचे केंद्रबिंदू ठरणाऱ्या वरळी मतदारसंघात पुन्हा एकदा संघर्षाची स्थिती निर्माण झाली आहे. गणपती विसर्जनासाठी तयार करण्यात आलेल्या कृत्रिम तलावावरून भाजप आणि उबाठा गटात वाद पेटला असून दोन्ही पक्षांत श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे. त्यामुळे वरळीच्या मैदानात पुन्हा एकदा राजकीय नुराकुस्तीचा डाव रंगण्याची चिन्ह दिसू लागली आहेत.

येथे क्लिक करा >> ईको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करा, जिंका ५१ हजारांचे बक्षीस!

सध्या सुरू असलेल्या गणेशोत्सवाच्या अनुषंगाने मुंबई महापालिकेच्या माध्यमातून आणि मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या प्रयत्नांतून जांबोरी मैदान भागात कृत्रिम तलाव उभारण्यात आला आहे. वास्तविक महापालिकेच्या वतीने हा बांधण्यात आला असला तर याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न मात्र उबाठा गटाकडून करण्यात आला. यावर भाजपनेही बॅनरला बॅनरनेच जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. त्यामुळे आता गणेशोत्सव काळातही भाजप आणि उबाठा गट या दोन्ही पक्षात तलावावरून चिखलफेक सुरू झाली आहे.