मुंबई : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) अंतर्गत सातारा येथे ८ वी, १० वी उत्तीर्णांना संधी रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. दरम्यान, या भरतीच्या माध्यमातून जिल्ह्यातील तरुणांना रोजगाराची संधी मिळणार आहे. या माध्यमातून संसाधन व्यक्तींची १०० पदे भरली जाणार आहेत.
तसेच, 'मनरेगा'ने सातारा इच्छुक आणि पात्र उमेदवारांची भरती अधिसूचना जाहीर केली आहे. या अंतर्गत संसाधन व्यक्ती या पदासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. यात उमेदवाराचे वय १८ ते ५८ वर्षे दरम्यान असणे बंधनकारक असणार आहे.
या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार शेवटच्या तारखेपूर्वी त्यांचे अर्ज नमूद केलेल्या पत्त्यावर पाठवू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ सप्टेंबर २०२३ असणार आहे. मनरेगा सातारा भरतीसाठी आवश्यक पात्रता तपशीलात शैक्षणिक पात्रता म्हणून मनरेगा सातारा अधिकृत अधिसूचनेनुसार उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून १०वी उत्तीर्ण केलेली असावी.
मनरेगा सातारा भरती (संसाधन व्यक्ती) नोकऱ्यांसाठी अर्ज कसा करावा
इच्छुक आणि पात्र उमेदवार विहित अर्जाच्या नमुन्याद्वारे ऑफलाइन अर्ज करू शकतात. अर्जदाराने संबंधित स्व-प्रमाणित कागदपत्रांसह अर्ज रोजगार हमी योजना शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय सातारा येथे पाठवणे आवश्यक आहे. १३-सप्टे-२०२३ रोजी किंवा त्यापूर्वी विहित पत्त्यावर पाठवणे बंधनकारक असणार आहे.