नूह हिंसाचारातील आरोपी काँग्रेस आमदार मामन खानचा पोलिस कोठडीतील मुक्काम वाढणार

    19-Sep-2023
Total Views | 45
maman khan mla  
 
चंडीगड : हरियाणामधील नूह येथे झालेल्या हिंसाचारात सहभागी असल्याबद्दल काँग्रेसचे आमदार मामन खान यांना पुन्हा एकदा चौकशीसाठी पोलीस कोठडीत घेण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. नगीना पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या सहा एफआयआरमध्ये नाव असलेल्या आरोपींसोबत मामन खान यांचे हिंसाचारपूर्व संभाषण आणि व्हॉट्सअॅपवर पाठवलेले संदेश रेकॉर्ड करण्यात आले आहेत.
 
एसआयटीने मामन खान यांना चार गुन्ह्यांमध्ये आरोपी बनवले असून दोन वेळा त्यांची दोन दिवसांची कोठडी घेतली आहे. आज पोलिस कोठडीची मुदत संपल्याने आरोपी आमदाराला दुपारी एकनंतर न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. मामनच्या चौकशीत आमदाराचा आयटी सेलही सक्रिय असल्याचं समोर आलं आहे.
 
मामन खानला न्यायालयात नेताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून यंत्रणा सज्ज आहे. आज मध्यरात्री १२ वाजेपर्यंत जिल्ह्यात इंटरनेट सेवा बंद राहणार आहे. सकाळपासूनच शहरात बंदोबस्त कडक करण्यात आला आहे. ३१ जुलै रोजी झालेल्या हिंसाचारात सहभागी लोकांना भडकावल्याच्या आरोपाखाली अटक केल्यानंतर पोलीस कोठडीत असलेले काँग्रेस आमदार ममन खान अजूनही चौकशीदरम्यान उत्तरं देण्याचे टाळत आहेत.
 
अटक करण्यापूर्वी हायकोर्टात याचिका दाखल करताना, घटनेच्या आधी आणि त्या दिवशी आपण शहरात नसल्याचा दावा त्यांनी केला होता. परंतु हिंसाचाराचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) सदस्यांनी चौकशीदरम्यान त्याच्या ठिकाणाविषयी प्रश्न विचारले असता, आरोपीने थेट उत्तर दिले नाही आणि ते न्यायालयात आपली बाजू मांडणार असल्याचे सांगितले.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
वसईत योगेश्वर भावकृषी लागवडीसाठी शेतात स्वाध्यायींचा भक्तिमय भावार्थ , बालसंस्कार केंद्रातील मुलेही रमली चिखलात

वसईत योगेश्वर भावकृषी लागवडीसाठी शेतात स्वाध्यायींचा भक्तिमय भावार्थ , बालसंस्कार केंद्रातील मुलेही रमली चिखलात

परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले प्रेरित स्वाध्याच्या अनेक प्रयोगातील योगेश्वर भावकृषिचा प्रयोग म्हणजे ईश्वराच्या भक्ती बरोबर सर्वांनी मिळून सामाजिकता जपण्याचे भान ठेवणारा अनोखा प्रयोग . याप्रमाणे वसई तालुक्यातील अनेक गावांत सद्ध्या योगेश्वर भावकृषि लागवड सुरू असून स्वाध्यायींचा श्रमभक्तिमय भावार्थ यातून दिसून येतो.वसई पूर्वेतील एका गावात अश्याच प्रकारच्या भावार्थाने स्वाध्यायीं भातशेती लागवडीसाठी रविवारी कृषिवर एकत्र आले होते.यामध्ये बालसंस्कार केंद्रातील मुलेही समाविष्ट झाली होती.यावेळी मुलांची ..

वंशावळीतून वगळणे ही फसवणूकच; सर्वोच्च न्यायालयाचा बहिणींना दिलासा

वंशावळीतून वगळणे ही फसवणूकच; सर्वोच्च न्यायालयाचा बहिणींना दिलासा

बेंगळुरू मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (बीएमआरसीएल) कडून ३३ कोटी रूपयांची भरपाई मिळवण्यासाठी वंशावळ आणि विभाजन करारात खोटेपणा करून पाच बहिणींना संपत्तीतून वगळल्याच्या आरोपावरून सर्वोच्च न्यायालयाने दोन आरोपीविरुद्ध फौजदारी खटला चालवण्याचे निर्देश नुकतेच दिले आहेत. याबाबतीत न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्या. पी.बी. वराले यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले की, “प्रथमदर्शनी पुरावे असे दर्शवतात की संबंधित कागदपत्रे मुद्दाम खोटी तयार करण्यात आली असून, त्याचा उद्देश दिवंगत के. जी. येल्लप्पा रेड्डी यांच्या पाच मुलींना ..

कल्याणच्या एपीएमसी मार्केट संचालकावर राजीनामा देण्याची आली वेळ - प्रशासकाच्या मनमानी कारभारा विरोधात संचालकांचा संताप

कल्याणच्या एपीएमसी मार्केट संचालकावर राजीनामा देण्याची आली वेळ - प्रशासकाच्या मनमानी कारभारा विरोधात संचालकांचा संताप

कल्याणच्या एपीएमसी मार्केटमधील भूखंड लक्ष्मी मार्केट व्यापारी संघटनेला दिल्यानंतर एपीएमसीमधील संचालक प्रशासकावर चांगलेच संतापले आहे. हा भूखंड नियमबाह्य पद्धतीने दिला गेला असल्याचा आरोप करीत आमच्या संचालकांच्या चालत नाही तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जाऊन राजीनामा देण्याचे विधान केल्याने राजकीय वर्तूळात एकच खळबळ उडाली आहे. लक्ष्मी मार्केटच व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. घेतलेला भूखंड हा कायदेशीर आहे. एपीएमसीमधील काही लोक आर्थिक फायद्यासाठी हे सगळे करीत आहे. या वादामुळे एपीएमसी व्यापारी ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121