नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी जी-२० शिखर परिषदेत जारी केलेल्या 'दिल्ली घोषणापत्रावर एकमत निर्माण केल्याबद्दल भारताचे जी-२० शेर्पा अमिताभ कांत यांचे कौतुक केले. थरूर म्हणाले की जी-२० मध्ये भारतासाठी ही एक विशेष कामगिरी आणि अभिमानास्पद क्षण आहे.
Well done @amitabhk87! Looks lile the IFS lost an ace diplomat when you opted for the IAS! "Negotiated with Russia, China, only last night got final draft," says India's G20 Sherpa on 'Delhi Declaration' consensus. A proud moment for India at G20! https://t.co/9M0ki7appY
एका मुलाखतीत अमिताभ कांत यांच्या वक्तव्याचा आधार घेऊन शशी थरूर यांनी रशिया-युक्रेनबाबत जी-२० देशांमध्ये एकमत निर्माण केल्याबद्दल त्यांचे कौतुक केले. थरूर यांनी ट्विटमध्ये लिहिले की, शाब्बास अमिताभ कांत, तुमच्या आयएएस निवडीमुळे आयएफएस (भारतीय परराष्ट्र सेवा) ने एक उच्च मुत्सद्दी गमावला आहे.
जी-20 शिखर परिषदेच्या दिल्ली घोषणापत्रात भारताने रशियाचा उल्लेख न करता युक्रेन युद्धाबद्दल चिंता व्यक्त केली आहे. याचे श्रेय भारताचे जी-२० शेर्पा अमिताभ कांत यांना जाते. अमिताभ कांत यांच्या याच कामगिरीवर आनंदीत झालेल्या शशी थरुर यांनी अमिताभ कांत यांचे कौतुक केले.