स्वीडन, डेन्मार्कनंतर आता या इस्लामिक देशात कुराणाच्या ४५ प्रती जाळल्या!

१० हजार लोक रस्त्यावर, पोलिसांवरही हल्ला

    09-Aug-2023
Total Views | 1526
Massive protests held after two men burn several copies of Quran

नवी दिल्ली
: स्वीडन आणि डेन्मार्कनंतर आता इस्लामिक देश बांगलादेशमध्ये कुराणच्या प्रती जाळण्यात आल्या आहेत. नूरूर रहमान आणि मेहबूब आलम नावाच्या दोघांनी मिळून ही घटना घडवली. ही माहिती समोर आल्यानंतर सुमारे १० हजार लोकांनी रस्त्यावर निदर्शने केली. तसेच दोन्ही आरोपींना जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

कुराण जाळल्याच्या आरोपावरून पोलिसांनी बांगलादेशच्या ईशान्येकडील शहर सिलहटमधून दोघांना अटक केली. शाळेचे मुख्याध्यापक नूरुर रहमान आणि त्याचा सहकारी मेहबूब आलम अशी आरोपींची ओळख पटली. आरोपींचे म्हणणे आहे की, कुराणच्या प्रती खूप जुन्या होत्या आणि काहींमध्ये छपाईच्या चुका होत्या. त्यामुळे त्यांनी कुराणच्या प्रती जाळल्या. या दोघांकडून पोलिसांनी कुराणाच्या ४५ जळालेल्या प्रती जप्त केल्या आहेत.

एएफपीने पोलीस अधिकारी अजबहार अली शेख यांनी सांगितले की, ६ ऑगस्ट आणि ७ ऑगस्ट रोजी रात्री १० हजार लोक कुराण जाळण्याच्या विरोधात निदर्शने करत होते. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी रबराच्या गोळ्या आणि अश्रुधुराच्या नळकांड्या वापराव्या लागल्या.
 
Wion ढाका ट्रिब्यूनच्या हवाल्याने म्हटले आहे की, सिलहट मेट्रोपोलिटन पोलिस आयुक्त मोहम्मद इलियास शरीफ म्हणतात की,शाळेतील शिक्षक, विद्यार्थी आणि परिसरातील इतर लोक कुराण जाळल्याबद्दल मुख्याध्यापक आणि इतर आरोपींवर संतप्त होते. त्यामुळे जमावाने दोघांना घेरून बेदम मारहाण केली. मात्र, नंतर पोलिसांनी दोघांचीही सुटका केली. यावेळी संतप्त जमावाने पोलिसांवरही हल्ला केला. या हल्ल्यात १४ पोलीस जखमी झाले आहेत. पोलिस आणि इस्लामवाद्यांमध्ये झालेल्या संघर्षात आणखी काही लोक जखमी झाल्याची माहिती आहे. मात्र जखमींचा आकडा निश्चित होऊ शकला नाही.
 
गेल्या काही महिन्यांत युरोपीय देश स्वीडन आणि डेन्मार्कमध्ये अनेक वेळा कुराण जाळण्यात आले आहे. याला विरोध करत अनेक इस्लामिक देशांनी दोन्ही देशांच्या सरकारांना थांबवून कारवाई करण्याची मागणी केली आहे. तथापि, स्वीडन आणि डेन्मार्क या दोन्ही देशांचे म्हणणे आहे की,देशाच्या कायद्यामुळे ते काहीही करू शकत नाहीत. खरंच, स्वीडनमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्याबाबत कडक कायदे आहेत. या अंतर्गत लोक तिथे कुराण जाळत आहेत.


अग्रलेख
जरुर वाचा
ठाणे- बोरिवली प्रकल्प बोगद्याची लांबी वाढविण्याचा निर्णय बोगदा मुल्लाबाग ऐवजी सत्यशंकरच्या भिंतीपर्यंत वाढवण्यात येणार

ठाणे- बोरिवली प्रकल्प बोगद्याची लांबी वाढविण्याचा निर्णय बोगदा मुल्लाबाग ऐवजी सत्यशंकरच्या भिंतीपर्यंत वाढवण्यात येणार

ठाणे- बोरिवली बोगदा प्रकल्पामुळे ठाण्यातील मुल्लाबाग येथील इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना होणारा त्रास दूर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ठाणे-बोरिवली दरम्यान बनणारा बोगदा मुल्लाबाग ऐवजी सत्यशंकरच्या भिंतीपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे स्थानिक रहिवाशांना वाहतूक कोंडीतून दिलासा मिळणार आहे.तसेच त्यांना होणारा धूळ आणि ध्वनी प्रदूषणाचा त्रास कमी करण्यासाठी बंदिस्त केलेल्या कन्व्हेयर बेल्टद्वारे राडारोडा वाहून नेण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121