लोकसभेत शेवटच्या चेंडूवर षटकार मारू : पंतप्रधान नरेंद्र मोदी

भाजप संसदीय पक्षाच्या बैठकीत मार्गदर्शन

    08-Aug-2023
Total Views | 145
PM Narendra Modi On No Confidence Motion

नवी दिल्ली
: विरोधी पक्षांनी आणलेला अविश्वास ठराव हा सरकारविरोधात नसून त्यांच्यातीलच अविश्वासाचे निदर्शक आहे. त्यामुळे लोकसभेत शेवटच्या चेंडूवर षटकार मारू, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत केले आहे.

भाजपच्या संसदीय पक्षाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाजपच्या लोकसभा आणि राज्यसभेच्या खासदारांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी विरोधी पक्षांच्या अविश्वास ठरावाविषयी भाजप सदस्यांना मार्गदर्शन केले. यावेळी ते म्हणाले, विरोधी आघाडी 'इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुझिव्ह अलायन्स' स्वतःच अविश्वासाने भरलेली आहे आणि आपल्या घटक पक्षांच्या विश्वासाची चाचणी घेण्यासाठी त्यांनी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला आहे. ही आघाडी अहंकाराने भरलेली असून अविश्वास ठरावाद्वारे आपला राजकीय अजेंडा पूर्ण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यामुळे अविश्वास ठरावाच्या चर्चेत शेवटच्या चेंडूवर षटकार मारू, असा विश्वास त्यांनी खासदारांना दिला.

विरोधी पक्षांवर निशाणा साधत पंतप्रधान म्हणाले की त्यांचे नेते सामाजिक न्यायाची चर्चा करतात पण घराणेशाही, तुष्टीकरण आणि भ्रष्ट राजकारणातून त्यांनी सर्वात जास्त नुकसान केले आहे. भ्रष्टाचार, घराणेशाही आणि तुष्टीकरणाचे राजकारण संपवण्याची हीच वेळ असल्याचे ते म्हणाले.




अग्रलेख
जरुर वाचा
लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

संत गाडगे महाराज विचार मंच महाराष्ट्र राज्य आणि ज्ञानज्योत फाऊंडेशन महाराष्ट्र यांच्या वतीने देण्यात येणारा ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ या वर्षी लेखक, साहित्यिक जयेश मेस्त्री यांना प्राप्त झाला आहे. दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील साहित्य क्षेत्रात उत्तम कामगिरी करणार्‍या साहित्यिकांचा गौरव करण्यात आला. दिनांक ०७ जून २०२५ रोजी पुणे येथील सदाशिव पेठेतील वेदशास्त्रोत्तेजक सभागृह येथे हा सुंदर सोहळा पार पडला. या प्रसंगी प्रसिद्ध उद्योजक डॉ. रामदास कुटे हे उद्घाटक म्हणून उपस्थित होते. तसेच ..

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

: मराठी साहित्यातील प्रतिष्ठीत मानल्या जाणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनचा ९९ व्या सोहळा आगामी वर्षात साताऱ्यात पार पडणार आहे. ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजन करण्याचा मान साताऱ्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेला आणि मावळा फौंडेशनला मिळणार आहे.अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पुणे येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी, उपाध्यक्ष गुरुय्या स्वामी, कार्यवाह सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121