भविष्यात विना इंटरनेट टीव्ही पाहायचा आहे? सरकार काय पाऊल उचलणार?
सरकारची विना इंटरनेटची दमदार योजना पण टेलिकॉम कंपन्यांचा विरोध
नवी दिल्ली - सरकारच्या पुढाकाराने विना इंटरनेट मोबाईलवर टीव्ही सुविधा मिळावी असे प्रयत्न असल्याचे समजते आहे.डायरेक्ट टू होम (डीटीएच)तंत्रज्ञानामुळे ही सुविधा उपलब्ध होऊ शकते.ही सुविधा उपलब्ध झाल्यास त्याचा मोठा फायदा मोबाईल धारकांना होऊ शकतो. टेलिकॉम ऑफ टेलिकम्युनिकेशन व माहिती व प्रसारण मंत्रालय यांच्या प्रयत्नातून ही सुविधा भविष्यात मिळू शकते.
५ जी लाँच झाल्यापासून सर्वसामान्यांना तंत्रज्ञानाचा लाभ व्हावा असा दृष्टिकोन ठेवून सरकारक याकडे पाऊस टाकत आहे.दुसरीकडे मात्र टेलिकॉम कंपन्या याला विरोध करण्याचा पवित्र्यात आहे.टेलिकॉम कंपन्यांना महसूल डेटा कन्समशन,आणि व्हिडिओ कंटेंट यातून मिळत असतो. त्यांचा उत्पन्नावर परिणाम होणार यासाठी टेलिकॉम सर्विस कंपन्यानी विरोध केला आहे.
त्यामुळे येणाऱ्या काळात सरकार काय निर्णय घेईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.