
मुंबई तरूण भारत एक्सक्लुझिव - कला दिग्दर्शक नितीन देसाई आत्महत्येप्रकरणी इडलवाईसची प्रेसनोट प्रसिद्ध
या प्रकरणात इडलवाईसचा स्पष्टीकरणाने व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आदेशामुळे हे प्रकरण नक्की काय वळण घेणार?
मुंबई: नितीन देसाईंच्या आत्महत्येप्रकरणी ईडलवाईसचे अधिकृत पत्र मुंबई तरूण भारतच्या हाती आले आहे.नितीन देसाई यांनी आत्महत्या केल्या प्रकरणी इडलवाईसवर एफआयआर नोंदवल्या गेल्याची बातमी मिडियात प्रसिद्ध झाली होती. सुमारे २५० कोटींचे कर्ज नितीन देसाई यांच्यावर होते. कर्ज न फेडता आल्याचा दबावाने नितीन देसाई चिंतीत होते.कर्जवसुलीचा दबावाखाली येऊन देसाई यांनी आत्महत्या केल्याची भावना समाजात वेगवेगळ्या वक्तव्यांनी स्पष्ट झाली.
इललवाईचा प्रेस रिलिजनुसार,श्री नितीन देसाई यांना थीम पार्क बांधण्याचा उद्देशाने २०१६ व २०१८ मध्ये वर्किंग कॅपिटल साठी अर्थसहाय्य करण्यात आले होते.कंपनीचा आर्थिक स्तर २०२० नंतर अडचणीत आल्याने कंपनीने पुनः वित्त उभे करण्यासाठी प्रयत्न केले.एनसीएलटी ( नॅशनल कंपनी लॉ ट्रायब्युनल) कडे जाण्याची तयारी दाखवली.२०२३ साली एनसीएलटीचा दरवाजा कंपनीने ठोठावला.
इललवाईसचा म्हणण्यानुसार,त्यांनी कुठल्याही प्रकारचे अनाधिकृत काम केले नाही.किंवा कुठल्याही प्रकारचा गैरमार्गाने वसुलीसाठी दबाव आणला नाही.कंपनीच्या वतीने त्यांनी आरबीआयच्या नियमावलीनुसारच काम केले असून अवाजवी व्याज दर आकारला नाही.देसाईंच्या आत्महत्येप्रकरणी ईडलवाईसने दुःखद घटना म्हणून पत्रकात उल्लेख केला आहे.
इडलवाईस ग्रुपने उच्च स्तरीय चौकशीला पूर्ण सहकार्य करण्यासाठी तयार असल्याच स्पष्ट केले आहे.राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच या प्रकरणी चौकशी करून इललवाईसचे चेअरमन रसेश शहा आणि ४ सदस्य यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत.
'फ्री प्रेस जर्नल' चा बातमीनुसार हे गुन्हे दाखल करण्यात आल्याने अनेक वित्तीय संस्थेचे उद्योजक यामुळे नाराज झाले आहेत.ज्या दिवशी गृहमंत्र्यांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले त्याच दिवशी देसाईंच्या पत्नी नैना देसाई यांनी इडलवाईस आत्महत्येप्रकरणी जबाबदार असल्याचा आरोप करून तक्रार दाखल केली.
या विषयावर मुंबई तरूण भारत वृत्तपत्राशी बोलताना नितीन देसाईंचे वर्गमित्र श्री श्रीकांत दिक्षित म्हणाले,'या प्रकरणी सगळीकडे चर्चा चालू आहे पण मुख्य मुद्दावर चर्चा होतच नाही.ते आर्थिक अडचणीत होते हे सगळ्यांनाच माहिती होते.वित्तीय संस्थांकडून कर्ज घेतल्यावर त्यांची रक्कम थकीत होती.मुख्य मुद्दा हा आहे या व्यक्तीने खूप गणपती मंडळ,एनजीओ यांना मदत केली.रात्री अडीच वाजता मंडळासाठी सजावट करण्यासाठी देसाई हिरीरीने पुढे असत. पण आज अडचणींच्या काळात ही मंडळे उभी राहिलेली दिसत नाही हे दुर्दैव म्हणावे लागेल.'आर्थिक संकट कोणालाही येऊ शकतात.कोविड काळात त्यांचा स्टुडिओला उत्पन्न येत नव्हते.१५० कर्मचाऱ्यांचा डोलारा सांभाळणे कठीण गोष्ट होती.हैद्राबादचा रामोजी स्टुडिओचा धर्तीवर महाराष्ट्रात भव्य स्टुडिओ असावा ही देसाईंची पहिल्यापासून इच्छा होती. झालेली घटना दुःखद आहे.'
प्रसारमाध्यमांत त्यांचे काही जणांशी कलाविश्वात वाद झाले होते या संबंधी जेव्हा श्री दिक्षित यांना विचारले तेव्हा ते म्हणाले,'या बद्दल कल्पना नाही.परंतु कुठल्या क्षेत्रात किंवा कुठल्या माणसाचे वाद नसतात? त्यामुळे या टीआरपी वाढवण्यासाठी असलेल्या गोष्टीला काही अर्थ नाही.पत्रकारांच्या दृष्टीने तुमचे प्रश्न बरोबर आहेत परंतु वास्तवात जे खर आहे तेच महत्वाचे असते.'
या प्रकरणी अजून तपशील इडलवाईस फायनान्स या वित्तीय संस्थेकडून प्राप्त होऊ शकला नाही.