जर तुम्हाला स्वतःला जगाबद्दल निराशावादी वाटत असेल, तर तुमच्या सभोवतालच्या शेजारपाजारच्या लोकांकडे एक नजर टाका, जे तुम्हाला प्रोत्साहन देण्यास मदत करू शकतात. प्रेरणादायी लोकांच्या कथांवर लक्ष केंद्रित करा, जे खरंच महान गोष्टी करत आहेत आणि समाजासाठी शक्तिशाली योगदान देत आहेत.
प्रत्येकाने फक्त सरावासाठी दररोज ज्या गोष्टींचा त्याला तिरस्कार वाटतो, अशा किमान दोन गोष्टी केल्या पाहिजेत,” हे विचार आहेत मानसशास्त्रज्ञ आणि तत्वज्ञानी विल्यम जेम्स यांचे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, जीवन नेहमीच सोपा मार्ग काढण्यासाठी नसावे. कधीकधी प्रतिकूल परिस्थिती आणि आव्हानामुळे सर्वात मोठे शिकण्याचे अनुभव येत असतात. या काळात तुम्ही स्वतःबद्दल, तुमच्या सामर्थ्याबद्दल आणि तुमच्या कमकुवतपणाबद्दल खूप काही शिकून घेण्याची संधी मिळवत असत. जेम्स यांच्या म्हणण्यानुसार, काहीवेळा आपल्याला या क्लिष्ट क्रियाकलापांमध्ये सहभागी व्हायचे नसेल किंवा आनंद घ्यायचा नसेल, तरीही काही गोष्टी करणे महत्त्वाचे आहे.
एखाद्या उत्कट अंतर्मुख व्यक्तीसाठी, अनोळखी व्यक्तींशी सहज संवाद सुरू करणे, हे एखाद्या अनपेक्षित गोष्टीचे सकारात्मक उदाहरण असेल. जर तुम्ही रटाळ गोष्टीत अडकला असाल, तर जेम्स यांचा सल्ला घ्या. काहीतरी नवीन करून पाहण्यासाठी किंवा तुम्हाला आनंददायक वाटणार नाही, असे काहीतरी हाताळण्यासाठी स्वत:ला एक आव्हान देऊन पाहा. नवीन कौशल्य वर्गात प्रवेश घेणे, वेगळ्या प्रकारचा व्यायाम करून पाहणे किंवा मॅरेथॉनमध्ये सहभागी होणे अशा अनुभवांतून तुम्हाला कोणती नूतन कौशल्ये आणि ज्ञान मिळू शकते, ते पाहा.
आज सकारात्मक पुष्टीकरण करणे, हे स्वयं-मदत उद्योगाचे मुख्य घटक आहेत. परंतु, दररोज सकाळी आरशासमोर उभे राहून मी जिथे जाईन, तिथे तिथे समृद्ध जग निर्माण करेन आणि मला १०० टक्के खात्री आहे की, मी सर्व प्रकारच्या समृद्धीसाठी पात्र आहे. मी स्वतः एक अनन्यसाधारण, खास, सर्जनशील आणि अद्भुत व्यक्ती आहे किंवा मी फक्त पाच दिवसांत या जगाचा राजा होईन, असे काहीतरी भावनेच्या भरात बोलण्यात विश्वास वाटत नाही. हे आपल्याला अगदी मूर्खपणाचे (आणि कधीकधी दांभिक) वाटते.
उच्च ध्येय साध्य करणारे लोक खरोखर कसे विचार करत असतील याबद्दल संशोधन काय दर्शवते? कमी निपुण व्यक्ती अनेकदा अपयश टाळण्यासाठी अधिक प्रवृत्त असतात, तर उच्च यश मिळविणार्यांना आश्चर्यकारकपणे, अवघड परिस्तिथीतूनसुद्धा आपले इप्सित साध्य करण्याच्या मजबूत हेतूसाठी ओळखले जाते. आपल्या ध्येयासाठी प्रेरित व्यक्तींना काहीतरी महत्त्वाचे पूर्ण करण्याची तीव्र इच्छा असते आणि अवघड परिस्थितीत केलेल्या कामांमध्ये यश मिळाल्याने समाधान मिळते. परिणामी, ते त्यांच्या उद्दिष्टांचा पाठपुरावा करण्यासाठी दीर्घकाळापर्यंत अथक प्रयत्न करण्यास तयार असतात.
अपयश टाळणारे लोक एखाद्या मौल्यवान कार्यात अपयशी ठरण्याची शक्यता असल्यास स्वतःचे अक्षमतेच्या भावनेपासून रक्षण करण्यावर अधिक लक्ष केंद्रित करतात. परिणामी, ते अवघड परिस्थितीत यश-केंद्रित कार्ये करण्याचा वा प्रयत्न करण्याची शक्यता कमी असते आणि यश लवकर न मिळाल्यास ते कार्य ते सोडून देऊ शकतात. जेथे कार्ये पूर्णपणे टाळणे जमणार नाही, तेथे अपयश टाळणार्या व्यक्ती उगाचच विलंब करतात, कच खातात वा टाळाटाळ करू शकतात. त्या त्यांच्या सर्वोत्तम प्रयत्नापेक्षा कमी प्रयत्न वा श्रम करतात किंवा स्वतःलाअडथळे आणणार्या इतर वर्तनात गुंतू शकतात. ज्यामुळे ते अयशस्वी झाल्यास त्यांना चेहरा वाचवण्याचे निमित्त मिळू शकते. (उदा. महत्त्वाच्या परीक्षेच्या आदल्या रात्री खूप मद्यपान करणे).
अमेरिकन मानसशास्त्रज्ञ कार्ल रॉजर्स म्हणतात की, “जगाच्या स्थितीबद्दल निराशावादी वाटणे खूप सोपे आहे. कानावर येणार्या आणि समाजमाध्यमांवर दिसणार्या बातम्या शोकांतिका आणि मानवी दुःखाच्याकथांनी पुरेपूर भरलेल्या दिसतात. तुमचे सोशल मीडिया फीड तुम्हाला सतत भांडणे, वाद आणि संकटांवर लक्ष केंद्रित करणार्या कथानकात गुंतवायचा प्रयत्न करत असते. अशा कथांवर लक्ष केंद्रित केल्याने, जग एक भयंकर ठिकाण वाटू शकते. बातम्या, लेख आणि सोशल मीडिया कथा तुमच्या सभोवतालच्या जगात काय चालले आहे, याचे खरे स्वरूप देत नाहीत.”
जर तुम्हाला स्वतःला जगाबद्दल निराशावादी वाटत असेल, तर तुमच्या सभोवतालच्या शेजारपाजारच्या लोकांकडे एक नजर टाका, जे तुम्हाला प्रोत्साहन देण्यास मदत करू शकतात. प्रेरणादायी लोकांच्या कथांवर लक्ष केंद्रित करा, जे खरंच महान गोष्टी करत आहेत आणि समाजासाठी शक्तिशाली योगदान देत आहेत. वैयक्तिक लोकांवर आपण लक्ष केंद्रित केल्याने आपल्याला जगाचा अधिक आशावादी आणि वास्तववादी दृष्टिकोन दिसण्यास मदत होऊ शकते. कार्ल रॉजर्सने सुचवल्याप्रमाणे, जग दयाळू आणि उदार लोकांनी भरलेले आहे, जे महान आशावादाला प्रेरणा देऊ शकतात. सुप्रसिद्ध सिंधुताई सपकाळ यांचे एकटीचे उदाहरण नकारात्मक वाटणार्या जगाला स्फूर्तिदायी आहे. त्यांचे एकाकी कष्ट आणि जगण्यासाठी सहन केलेल्या अनंत खस्ता आपल्याला आश्चर्यचकीत तर करतात.
पण, तरीसुद्धा या जगात उर्मी असेल, तर एकट्यानेसुद्धा काही महान करता येते, याची आपल्या सामान्यांना खात्री पटते. तुमच्या आयुष्यातील सर्वोत्तम वर्षे अशी असतात, ज्यात तुम्ही तुमच्या समस्या तुमच्या स्वतःच्या आहेत हे ठरवता. त्यासाठी तुम्ही तुमच्या आई-वडिलांना, पर्यावरणाला किंवा देशाला दोष देत नाही. तुम्हाला इतके नक्की समजते की, तुम्ही तुमच्या नशिबावर नियंत्रण ठेवून आहात.विवेकनिष्ठ विचारपद्धतीचे जनक सुप्रसिद्ध अल्बर्ट एलिसचे हे वाक्य खूप मोलाचे आहे. ते आपल्या स्वतःच्या जीवनाची आणि निवडींची जबाबदारी घेण्याबद्दल आहे. “स्पष्टपणे, तुमच्या जीवनाचे असे काही पैलू आहेत जे तुमच्या नियंत्रणाबाहेर आहेत. तुमच्यासोबत घडणार्या किंवा तुम्ही तुमच्या आयुष्यात अनुभवलेल्या सर्व गोष्टींवर नियंत्रण ठेवण्यास तुम्ही सक्षम नसाल, तरी तुम्ही त्या घटनांना कसा प्रतिसाद द्याल याची जबाबदारी तुम्ही निश्चितच घेऊ शकता.” (क्रमशः)
डॉ. शुभांगी पारकर