सातारा: छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह पोस्टमुळे तणाव!

    18-Aug-2023
Total Views | 88
 
Offensive post
 
 
सातारा: महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आक्षेपारर्ह पोस्ट केल्याने साताऱ्यात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. या घटनेने हिंदुत्त्ववादी संघटनांचे कार्यकर्ते आक्रमक झाले असुन घोषणाबाजी करत तीव्र निदर्शने केली. या परकरणी गुन्हा दाखल झाला असुन आरोपी अल्पवयीन असल्याचे सांगण्यात येत आहे. या आरोपीचे इन्टाग्रामअकाऊंट अन्य कोणी ऑपरेट करत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
 
आक्षेपार्ह पोस्ट निदर्शनास आल्याने काही वेळातच वातावरण तापले. हिंदुत्त्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने जिल्हाधिकारी कार्यालयात एकत्र जमत कार्यालयाच्या दारातच ठाण मांडले. अशा प्रवृत्तींना ठेचुन काढा, गुन्हेगारांवर कठोर कारवाई करा अशी संतप्त जमावाची मागणी होती. त्यानंतर हा जमाव कार्यालयाबाहेर आला आणि त्यांनी रस्त्यावर बसुन घोषणाबाजी केली. या आंदोलकांमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थांचा जास्त सहभाग पाहायला मिळाला.
 
संबंधितांवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी दिल्यानंतर तणाव निवळला.
 
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
विमानाने झेप घेताच २ मिनिटांत काळाचा घाला - अहमदाबादहुन लंडनच्या दिशेने जाणारे विमान कोसळले

विमानाने झेप घेताच २ मिनिटांत काळाचा घाला - अहमदाबादहुन लंडनच्या दिशेने जाणारे विमान कोसळले

अहमदाबादहून लंडनच्या दिशेने झेपावलेले एअरइंडियाचे फ्लाइट नंबर एआय-१७१ हे विमान उड्डाणानंतर अवघ्या २ मिनिटांत तांत्रिक बिघाडामुळे निवासी भागात कोसळले. या भीषण दुर्घटनेत अहमदाबादहून लंडनला निघालेल्या २४२ प्रवासी होते. यात २४१ प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. एक प्रवासी जखमी अवस्थेत मिळाला आहे. या २४२ प्रवाशांमध्ये आणि क्रू मेंबर्स, १६९ भारतीय नागरिक, ५३ ब्रिटिश नागरिक, १ कॅनेडियन नागरिक आणि ७ पोर्तुगीज नागरिक होते. या संपूर्ण दुर्घटनेबाबत जगभरातुन शोक व्यक्त करण्यात येत आहे. अत्यंत दुर्दैवी बाब म्हणजे ..

सिंचन वाढीसाठी मुख्यमंत्र्यांकडून कालबद्ध कार्यक्रम - ३८१ सिंचन प्रकल्पातून ३० लाख ६८ हजार ६७३ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार

सिंचन वाढीसाठी मुख्यमंत्र्यांकडून कालबद्ध कार्यक्रम - ३८१ सिंचन प्रकल्पातून ३० लाख ६८ हजार ६७३ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार

सिंचन क्षमता वाढवण्यासाठी राज्यातील ३८१ सिंचन प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या प्रकल्पांच्या माध्यमातून ३० लाख ६८ हजार ६७३ हेक्टर सिंचन क्षेत्र निर्माण होणार आहे. तर ४५ उदंचन प्रकल्पांच्या माध्यमातून ६२ हजार १२५ मेगावॅट वीज निर्मिती, तर ९६ हजार १९० रोजगार निर्मिती होणार आहे. राज्याचे विकासचक्र वेगवान करण्यासाठी सिंचन प्रकल्प आणि उदंचन जलविद्युत प्रकल्पांची कामे कालबध्दरित्या गतीने पूर्ण करावीत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवार, दि. १२ जून रोजी दिले...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121