हा कालखंड देशाला पुढे घेऊन जाईल, पंतप्रधान मोदींची लाल किल्ल्यावरुन घोषणा

    15-Aug-2023
Total Views |
 
Narendra Modi
 
 
नवी दिल्ली : देशाचा ७७ वा स्वातंत्र्यदिन साजरा होत आहे. देशभर उत्साहाचं वातावरण आहे. राजधानी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिरंग्याला सलामी देत देशातील नागरिकांना संबोधित केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज १० व्यांदा लाल किल्ल्यावरुन ध्वाजारोहण केलं आहे. यावेळी पंतप्रधानांनी अनेक नवीन योजनांची घोषणा केली. हा कालखंड देशाला पुढे घेऊन जाईल. असं मोदी आपल्या भाषणात म्हणाले.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "पुढील वर्षी या लाल किल्ल्यावरून मी तुमच्यासमोर देशाचे यश मांडणार आहे. मी तुमच्यातून आलोय,तुमच्यसाठी जगतोय. मी स्वप्न देखील तुमच्यासाठी पाहतोय. मी कष्ट करतोय ते देखील तुमच्यासाठी करत आहे. तुम्ही मला ही जबाबदारी दिली म्हणून मी हे करत नाही तर हा देश माझे कुटुंब आहे. त्यामुळे माझ्या कुटुंबातील सदस्यांना दु:ख झालेले मी पाहू शकत नाही. 2014 साली मी तुम्हाला आश्वासन दिले होते. मी देशात परिवर्तन आणणार.140 कोटी कुटुंबीयांनी माझ्यावर विश्वास ठेवला तो मी सार्थ ठरवण्याचा प्रयत्न करणार आहे."
 
अनेक योजनांविषयी सांगताना मोदी म्हणाले, "विश्वकर्मा जयंतीच्या निमित्ताने लोकांसाठी विश्‍वकर्मा योजना सुरू करणार आहे. विश्वकर्मा योजनेत 15 हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. शहरात जे लोक भाड्याच्या घरात राहतात. ज्यांच्याकडे स्वत:च घर नाही. जे अनधिकृत कॉलनीमध्ये राहतात. घर घेण्यासाठी बँकांकडून लोन मिळतं. त्यांना व्याजात सवलत दिली जाईल. त्यासाठी लवकरच घोषणा केली जाईल. देशाच्या स्वातंत्र्यासाठी महात्मा गांधी यांचं मार्गदर्शन, भगत सिंह-सुखदेव-राजगुरुसारख्या वीरांच बलिदान नेहमी लक्षात ठेवलं जाईल. ज्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलं, त्यांना नमन करतो. यावर्षी 26 जानेवारीला 75 वा प्रजासत्ताक दिन असेल. हा आमच्यासाठी इतिहास आहे."
 
"माझ लक्ष्य गावांमध्ये 2 कोटी लखपती दीदी बनवायच आहे. एग्रीकल्चर सेक्टरच्या माध्यमातून आम्ही वुमेन सेल्फ हेल्प ग्रुपची ट्रेनिंग देऊ. यात महिलांना ड्रोन चालवण्याच प्रशिक्षण देण्यात येईल. आम्हाला गावात महिलांना मजबूत करायच आहे. देशात आतापर्यंत 10 हजार जन औषधी केंद्र होती. आता हे लक्ष्य 25 हजार औषधी केंद्राच केलं आहे. म्हणजे अजून 15 हजार जन औषधी केंद्र सुरु होतील. ही मोदीची गॅरेंटी आहे, पुढच्या पाच वर्षात भारताचा पहिल्या टॉप 3 अर्थव्यवस्थांमध्ये समावेश होईल. मणिपूरसह देशाच्या काही भागात हिंसाचार झाला. अनेक लोकांनी आपलं जीवन गमावलं. आई-मुलीच्या सन्मानाशी खेळ झाला. आता शांततेच्या बातम्या येत आहेत. देशातील जनता मणिपूरसोबत आहे. केंद्र आणि राज्य सरकार मिळून शांतता प्रस्थापित करेल. देशाने एक हजार वर्षाची गुलामी पाहिली आहे. 1947 साली स्वातंत्र्य मिळालं. पुन्हा एकदा देशाला संधी मिळाली आहे. आता आपण जे करु, त्याचा परिणाम पुढच्या 1000 वर्षात दिसून येईल. भारत माता पुन्हा एकदा जागृत झाली आहे. हा कालखंड देशाला पुढे घेऊन जाईल." असा विश्वास मोदींनी व्यक्त केला.