मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत हिने गीतकार जावेद अख्तर यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीत कंगनाने जावेद अख्तर यांच्यावर खंडणी आणि धमकी दिल्याचा आरोप केला असून आता या प्रकरणावर मुंबई उच्च न्यायालयाने जावेद अख्तर यांना समन्स बजावले आहे. या कायदेशीर लढाईत आता कोर्टाने कंगनाला दणका दिला असून जावेद अख्तर यांना ५ ऑगस्ट रोजी न्यायालयात हजर राहण्यास सांगितले आहे. मात्र, मुंबईच्या मॅजिस्ट्रेट कोर्टाने जावेद अख्तर यांच्यावरील खंडणीचे आरोप फेटाळले असल्यामुळे त्यांना दिलासा मिळाला आहे.
मार्च २०१६ रोजी अख्तर यांनी कंगना आणि तिची बहीण रंगोली हिला घरी बोलावून ऋतिक रोशनची माफी माग असं म्हणाले होते. ही गोष्ट ह्रतिक आणि कंगना यांच्यात सार्वजनिक वाद सुरु होता तेव्हाची आहे. यावरुन कंगना रणावतने आपल्या याचिकेत जावेद अख्तर यांच्यावर आरोप लावले होते. दरम्यान, मंगळवारी कोर्टाने जावेद अख्तर यांच्यावरील खंडणीचा आणि इतर चार आरोप फेटाळून लावले.
न्यायालय म्हणाले की, 'एखाद्या व्यक्तीला लेखी माफी मागायला लावणे हे मौल्यवान संरक्षणाअंतर्गत येत नाही कारण कायदेशीर हक्क तयार केला जाऊ शकत नाही किंवा सोयीनुसार वाढवता येत नाही आणि तो ट्रान्सफॉर्मर देखील असू शकत नाही.'दंडाधिका-यांनी जावेद अख्तर यांना घाबरवून धमकावणे आणि महिलेच्या विनयशीलतेचा अपमान केल्याच्या आरोपाखाली समन्स जारी केले. त्यांना ५ ऑगस्ट रोजी अंधेरी न्यायालयात हजर राहावे लागणार आहे.
कोर्टाने जावेद अख्तर यांच्याविरोधात खंडणीचा कोणतेही गुन्हा दाखल झालेला नाही. मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट (अंधेरी कोर्ट) आर. एम. शेक यांनी २५ जुलैला जावेद अख्तर यांच्याविरोधात समन बजावत त्यांना ५ ऑगस्टला कोर्टात हजार राहण्यास सांगितले आहे.
कंगना रनौतने जावेद अख्तर यांच्याविरोधातील तक्रारीत म्हटले आहे की, जावेद अख्तर आणि त्यांचा एक सहकारीशी (हृतिक रोशन) झालेल्या वादानंतर त्यांनी कंगना आणि तिची बहीण रंगोली चंदेलला वाईट हेतूने घरी बोलावले आणि त्यांना धमकी दिली. जावेद अख्तर आणि कंगना यांच्यातील वाद नवीन नसून खूप कलाकपासून सुरू आहे. या वादाचे पुढे काय होणार हे ५ ऑगस्टला कळेल.