कोपरगाव : समृद्धी महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच आहे. समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघात झाला आहे. नांदेडहून मुंबईकडे जाणाऱ्या कारचा अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. नगरच्या कोपरगाव तालुक्यातील धोत्रे गावाजवळ हा भीषण अपघात झाला आहे.
दरम्यान दि. ३० जून रोजी झालेल्या भीषण अपघातात २५ जणांचा मृत्यू झाला होता. मात्र अपघातानंतर बसचा एक चालक कसा तरी काच फोडून बाहेर पडल्यानंतर त्यांने पोलीसांना घटनेची माहिती दिली. मात्र तोपर्यत बराच वेळ निघून गेला होता. त्यामुळे अपघाताची तीव्रता वाढून मदत घटनास्थळी पोहोचेपर्यंत मोठी जीवितहानी घडून गेली.