नवी दिल्ली : सुदानमधील देशांतर्गत युद्धात अडकून पडलेल्या भारतीयांची सुटका करण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाने २४ एप्रिलपासून ‘ऑपरेशन कावेरी’ही मोहीम सुरू केली होती. या मोहिमेद्वारे जल आणि हवाई मार्गाने हजारो भारतीयांना मायदेशात परत आणण्यात भारत सरकार यशस्वी झालं आहे. या मोहीमेअंतर्गत तब्बल ३,८६२ भारतीय सुखरूप मायदेशी परतले आहेत. त्यानंतर आता ही मोहीम बंद करण्यात आली आहे.