काँग्रेसचा विजय 'भारत जोडो यात्रे'मुळेच : राज ठाकरे

    14-May-2023
Total Views | 73
raj thackeray

मुंबई
: कर्नाटक विधानसभा निवडणूक निकालावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली. काँग्रेसचा विजय हा राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेमुळेच झाला आहे, अशी प्रतिक्रिया राज ठाकरेंनी माध्यमांना दिली. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा हा परिणाम असल्याचे राज ठाकरेंनी विधान केले. तसेच काँग्रेसच्या कर्नाटक विधानसभा विजयाचे श्रेय ठाकरेंनी काँग्रेस नेते राहुल गांधींचे असल्याची प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.

दरम्यान, राज ठाकरे म्हणाले, 'आपलं कोण वाकडं करू शकतो, असा जो विचार करतो त्याचा पराभव आहे. त्यामुळे जनतेला कुणीही गृहीत धरू नये याचा पुनरूच्चार राज ठाकरेंनी बोलताना केला. यातून सर्वांनी बोध घेण्याची गरज घेण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले. कर्नाटकातील वागणुकीमुळे भाजपचा पराभव झाल्याचे राज ठाकरेंनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. तसेच, पुढे काय घडू शकेल, हे सांगायला मी काही ज्योतिषी नाही, अशी मिश्किल टिप्पणी यावेळी केली.




अग्रलेख
जरुर वाचा
लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

संत गाडगे महाराज विचार मंच महाराष्ट्र राज्य आणि ज्ञानज्योत फाऊंडेशन महाराष्ट्र यांच्या वतीने देण्यात येणारा ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ या वर्षी लेखक, साहित्यिक जयेश मेस्त्री यांना प्राप्त झाला आहे. दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील साहित्य क्षेत्रात उत्तम कामगिरी करणार्‍या साहित्यिकांचा गौरव करण्यात आला. दिनांक ०७ जून २०२५ रोजी पुणे येथील सदाशिव पेठेतील वेदशास्त्रोत्तेजक सभागृह येथे हा सुंदर सोहळा पार पडला. या प्रसंगी प्रसिद्ध उद्योजक डॉ. रामदास कुटे हे उद्घाटक म्हणून उपस्थित होते. तसेच ..

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

: मराठी साहित्यातील प्रतिष्ठीत मानल्या जाणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनचा ९९ व्या सोहळा आगामी वर्षात साताऱ्यात पार पडणार आहे. ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजन करण्याचा मान साताऱ्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेला आणि मावळा फौंडेशनला मिळणार आहे.अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पुणे येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी, उपाध्यक्ष गुरुय्या स्वामी, कार्यवाह सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121