एअर इंडियाची इमारत लवकरच राज्य सरकारकडे ?

१६०० कोटींमध्ये सौदा निश्चित झाल्याच्या चर्चा

    07-Apr-2023
Total Views | 75
 
Air India
 
 
मुंबई : अपुरे पडणारी मंत्रालयातील कार्यालये आणि कामाचा प्रचंड व्याप या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. त्याच पार्श्वभूमीवर नरिमन पॉईंटच्या समुद्र किनारी उभी असलेली एअर इंडियाची आलिशान इमारत विकत घेण्यासाठी राज्य सरकारचे सुरू असलेले प्रयत्न फलद्रुप होताना दिसत आहेत. सरकार आणि एआय अ‍ॅसेट्स होल्डिंग लिमिटेडमध्ये इमारतीच्या किमतीवरून एकमत झाले असून लवकरच या इमारतीची मालकी राज्य सरकारकडे येणार असल्याचे बोलले जात आहे.
 
गृह विभागातील अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सरकार आणि एअर इंडिया इमारतीची मालकी ताब्यात असलेल्या एआय अ‍ॅसेट्स होल्डिंग लिमिटेडमध्ये अनेक वर्षांपासून या कराराबाबत बोलणी सुरू आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात या प्रक्रियेला वेग आला होता. विस्तारत जाणारे मंत्रालयाचे काम आणि त्या तुलनेने कमी पडत जाणारी जागा या अनुषंगाने देवेंद्र फडणवीस यांनी ही इमारत विकत घेण्यासाठी प्रयत्न देखील केले होते. परंतु, २०१९ मध्ये सत्ताबदल झाल्याने हे ही काम बारगळले होते. मात्र आता पुन्हा एकदा या कामाला वेग आला असून ही इमारत राज्य सरकारकडे येणार आहे.
 
''एअर इंडियाच्या इमारतीचा शंभर टक्के ताबा राज्य सरकारकडे दिल्यासच हा करार अंतिम करणार असल्याची अट सरकारकडून टाकण्यात आली आहे. सरकारकडून दिव्यांग कल्याण मंत्रालयाची घोषणा करण्यात आल्यानंतर या विभागाचे कार्यालय सुरु करण्यासाठी सरकारकडे मंत्रालयात जागा उपलब्ध नव्हती. अखेरीस मंत्रालयाच्या नजीकच्या एका इमारतीत या विभागाचे कार्यालय सुरु करण्यात आलेले आहे. त्यामुळे अपुऱ्या जागेचा विचार करता ही इमारत विकत घेण्यासाठी सरकारने अधिक प्रयत्न आहेत. तसेच मंत्रालयातील मंत्र्यांची दालने एअर इंडियाच्या इमारतीत हलवून अधिकारी आणि इतर मंडळींची कार्यालये मंत्रालयातच ठेवली जातील, अशा प्रकारच्या हालचाली सुरु असल्याची माहिती गृहविभागातील 'त्या' अधिकाऱ्याकडून देण्यात आली आहे.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
२६ वर्षांच्या छळाविरुद्ध शांततापूर्ण प्रतिकारातून मानवी विवेकाची साक्ष

२६ वर्षांच्या छळाविरुद्ध शांततापूर्ण प्रतिकारातून मानवी विवेकाची साक्ष

चिनी कम्युनिस्ट पार्टी अर्थात ‘सीसीपी’ने तेथील फालुन गोंग साधना अभ्यासकांवर केलेल्या अमानुष छळाविरुद्ध या अभ्यासकांनी शांतपणे आवाहन सुरू केले. त्याला आज २६ वर्षे होत आहेत. दि. २० जुलै १९९९ रोजी ‘सीसीपी’चे नेते जिआंग झेमिन यांनी फालुन गोंग आणि त्याच्या लाखो अनुयायांचा छळ सुरू केला आणि संपूर्ण देशात दहशतीची लाट पसरली. कम्युनिस्ट पक्षाने आपल्या राजकीय दडपशाहीच्या दीर्घ इतिहासात विकसित केलेल्या प्रत्येक छळ तंत्राचा वापर करूनही या अभूतपूर्व हल्ल्याचा सामना करत, फालुन गोंग साधकांनी पाठ फिरवली नाही. त्याऐवजी, ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121