हे राम!

    30-Apr-2023
Total Views | 129
 
Nashik Godavari concretization
 
 
नाशिकमधील गोदावरीमधील रामकुंडाती काँक्रिटीकरण काढण्याच्या मुद्यावरून नाशिक स्मार्ट सिटी आणि पुरोहित संघ, पंचवटी सिटीझन फोरम, वनवासी जीवरक्षक दल यांच्यात संघर्ष पेटला आहे. काँक्रिटीकरण काढल्यास नदीचे जलस्रोत मोकळे होऊन ती प्रवाही, स्वच्छ राहणार आहे. सध्याचे तिचे झालेले ‘काँक्रिट कॅनॉल’काढून ती बारामही स्वच्छ, प्रवाही राहील, असे गोदाप्रेमी देवांग जानी यांच्यासह, नदी अभ्यासक, पर्यावरणप्रेमींचे म्हणणे, तर रामकुंडातील काँक्रिटीकरण काढल्यास येथील नदीपात्र खोल झाल्याने भाविकाच्या जीवितास धोका अथवा इजा झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार असे, त्याला विरोध करणार्‍यांचे म्हणणे.
 
नाशिक स्मार्ट सिटी, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त व मनपा आयुक्त यांच्या त्रिसदस्यीय समितीच्या सूचनेनुसार, गोदावरीच्या आवर्तनाचा आढावा घेऊन पोलीस बंदोबस्तात रामकुंडातील काँक्रिट काढण्याच्या निर्णयावर ठाम आहे. मात्र, उपरोक्त नमूद संघटनांसह स्थानिक नागरिकांनी त्याला वाढता विरोध असून प्रसंगी न्यायालयात दाद मागण्यासह रस्त्यावर उतरण्याची तयारीही सुरू आहे.
 
या सार्‍याचा नदी, पर्यावरण, पारिस्थितीकी म्हणून अभ्यास केल्यास गोदापात्रातील सर्वच सर्व कुंडातील काँक्रिटीकरण काढणे नदीच्या प्रदूषणमुक्तीसाठी, प्रवाहासाठी केव्हाही उचित ठरणारेच!
 
नदी तेव्हाच जीवंत म्हटली जाते, जेव्हा तिच्या आत ‘जीन बँक’ (नदीच्या आत निसर्गत: असलेली जीवशास्त्रीय पारिस्थितीकी) अन् ती स्वच्छ राहावी म्हणून जीवंत झरे अथवा प्रवाहीपणासाठीची निसर्गदत्त योजना असते, अन्यथा नदी काँक्रिटच्या नाल्यासारखी ‘कृत्रिम कॅनॉल’ होते. रामकुंडात मृत व्यक्तींच्या अस्थींचे विर्सजन केले जाते. पूर्वी विर्सजित केलेल्या अस्थींचा खच तसाच न राहता तो पाण्यात विघटित होत असे. म्हणूनच रामकुंडाला पूर्वी ‘अस्थिविलय कुंड’ असेच म्हणत. मात्र, आज कुंडातील काँक्रिटीकरणामुळे त्याची स्वच्छता करतेवेळी अस्थींचा खच तसाच आढळून येतो. शिवाय आतील झरे पूर्णपणे बंद झाल्याने गोदावरी नदी मृतप्राय गळा घोटल्यासारखीच झाली आहे. हे नदीच्या अस्तित्वासाठी कदापि योग्य नाही. त्यामुळे रामकुंडातील काँक्रिटीकरण काढण्यास विरोध करण्यापेक्षा ज्या कारणांसाठी विरोध होतोय, त्याला पर्याय शोधणे केव्हाही योग्य!
 
 
‘सायबर’ गुन्हे रोखणारे ‘दूत’
 
 
संगणक, इंटरनेट, माहिती-तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेने मानवाचे जीवन सुसह्य केले. विज्ञान जसजसे प्रगत होत गेले तसे त्याचाच वापर करून गुन्हेगारीमध्ये विलक्षण स्थित्यंतरे झाली. ‘सायबर’ गुन्हेगारीविषयी नवीन पिढीतील विद्यार्थी, शिक्षक आदींमध्ये जागृती व्हावी अन् अशा गुन्ह्यांचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी नाशिकमधील ‘सायबर’ पोलिसांनी ’सायबर दूत’ उपक्रमाला महाराष्ट्र दिनापासून श्रीगणेशा केला हे स्तुत्यच! ‘सायबर’ जनजागृती कार्यशाळेत सहभागी विद्यार्थी, शिक्षक आदींना सायबरतज्ज्ञ, वरिष्ठ पोलीस अधिकारी मार्गदर्शन करणार आहेत. विशेष म्हणजे, यासाठी लागणारे साहित्यही पोलीस पुरवणार असल्याने यात विद्यार्थ्यांसह नागरिकांचा सहभाग विलक्षण वाढत जाणार आहे. देशभरातील हॅकर्स संगणकीय डेटा, प्रणाली ’हॅक’ करून ऑनलाईन आर्थिक फसवणूक करणे, एखाद्याच्या मोबाईलचा ’अ‍ॅक्सेस’ मिळवून त्याच्या बँक खात्यातील रक्कम परस्पर लंपास करणे, खासगी चॅट, फोटो, चित्रफिती आदी चोरून एखाद्याला ‘ब्लॅकमेल’ करणे, मोबाईल ‘हॅक’ करून एखाद्याचे खासगी जीवन चव्हाट्यावर आणून, त्यास मनस्ताप देणे या आणि अशा गंभीर ‘सायबर’ गुन्ह्यांचे प्रमाण नाशिकमध्ये गेल्या आठ वर्षांत प्रचंड वाढले. नागरिकांमध्ये असे गुन्हे घडल्यास काय करावे, कुठे गुन्हा नोंदवावा याचे काहीच ज्ञान नसते. विशेष म्हणजे, 40 टक्के ‘सायबर’ गुन्ह्यांची नोंदही ‘सायबर’ गुन्हे विभागात होत नसल्याची माहिती सायबरतज्ज्ञ देतात. या सर्व पाश्वर्र्भूमीवर नाशिकमध्ये सुरू झालेला ‘सायबर दूत’ हा उपक्रम नक्कीच उपयुक्त ठरणार आहे.
 
नागरिकांनी ’सायबर दूत’चे प्रशिक्षण पूर्ण करणार्‍यांना पोलिसांकडून प्रमाणपत्र व ’सायबर दूत’चा बॅच देण्यात येणार आहे, असा बॅच मिळालेले ‘सायबर दूत’ इतरांना सायबर साक्षर करण्यासह अशा पद्धतीची गुन्हेगारी रोखण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. शहर पोलीस मुख्यालयाच्या भीष्मराज हॉलमध्ये पहिल्या बॅचमधून सुमारे 300 विद्यार्थी, शिक्षक ‘सायबर दूत’चे प्रशिक्षण घेऊन बाहेर पडतील आणि त्यानंतर नियमित अशा बॅचेसमधून अनेक नागरिक सायबर साक्षर होऊन सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावण्यास सिद्ध होतील. नाशिक पोलिसांच्या या उपक्रमाने ‘ब्लॅक हॅट हॅकर्स’चा काळ्या गुन्हेगारी कारवायांना अंकुश बसणार, हे नक्की..!
 
-निल कुलकर्णी
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
सामान्य तिकीट घेऊन फर्स्ट क्लासचा प्रवास करताय?; टीसी आकारणार दंड

सामान्य तिकीट घेऊन फर्स्ट क्लासचा प्रवास करताय?; टीसी आकारणार दंड

मध्य रेल्वेच्या उपनगरीय गाड्यांच्या प्रथम श्रेणी डब्यांमध्ये “केंद्रित तिकीट तपासणी मोहीम” राबविण्यात येणार आहे. अनेकदा प्रथम श्रेणी डब्यात सामान्य तिकीट घेऊन अथवा तिकीट ना काढता प्रवास करणाऱ्यांमुळे गर्दी होते. त्यातून अनेकदा वाद निर्माण होतात. हेच लक्षात घेता प्रथम श्रेणी तिकीट अथवा पास घेणाऱ्या प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि सुकर करण्याच्या दृष्टीने मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने एक ठोस आणि निर्णायक पाऊल उचलले आहे. मध्य रेल्वे उपनगरीय गाड्यांच्या प्रथम श्रेणी डब्यांमध्ये “केंद्रित तिकीट तपासणी ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121