व्रजमूठ नव्हे तर सैल झालेली मूठ

नरेश म्हस्केंनी केली मविआवर खरपूस शब्दांत टीका

    19-Apr-2023
Total Views | 55
narewsh mhaske on mva vajramuth

ठाणे
: शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी नागपूर येथे झालेल्या वज्रमूठ सभेचा खरपूस शब्दांत समााचार घेतला. त्यांनी नागपूर येथे रविवारी झालेल्या वज्रमूठ सभेवर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, की नागपूर येथे झालेली सभेची "वज्रमूठ नव्हे तर सैल झालेली मूठ" अशा शब्दांत खिल्ली उडविली.

महाविकास आघाडीत नाराजी नाट्य सुरू असल्याचे सुतोवाच नरेश म्हस्केंनी केले. अजित पवारांच्या संदर्भात बोलताना म्हस्के म्हणाले, की त्यांची महाविकास आघाडीत गळचेपी होत आहे. त्यांच्याकडे ५६ आमदार आहे. त्यामुळे महाविकास आघाडीची वज्रमूठ ही सैल झालेली मूठ आहे, आणि हे सर्वांनी पाहिलेले आहे, असा दावा यावेळी म्हस्केंनी केला.

दरम्यान, ठाण्यात घेण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आज जरी अजित पवारांनी यातून माघार घेतली असली तरी ते येत्या काही दिवसात आपला निर्णय जाहीर करणार आहेत. त्यांनी आज अप्रत्यक्षपणे उध्दव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर देखील टिका केली आहे. त्यांची गळचेपी होत असल्याचे त्यांच्या समर्थक आमदारांना देखील दिसत आहे.

संभाजी नगरमध्ये झालेल्या महाविकास आघाडीच्या सभेत देखील ज्यांचे १५ आमदार आहेत, त्यांच्यासाठी वेगळी खुर्ची दिली जाते आणि सभा सुरु झाल्यानंतर त्यांची एन्ट्री होते, आणि ज्यांचे ५६ आमदार आहेत, त्यांना मात्र मानच दिला जात नाही, अशी टिका देखील त्यांनी केली. त्यामुळेच नागपुर येथे झालेल्या सभेत अजित पवार यांनी भाषण केले नसल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे त्यांनी शिवसेना, भाजप युतीला पाठींबा दिला तर त्यांचे आम्ही स्वागत करु आणि मानाचे पान त्यांना देऊ असेही म्हस्के यांनी स्पष्ट केले.

दुसरीकडे राहुल गांधी मातोश्रीवर येणार यावरुन देखील त्यांनी नाराजी व्यक्त करीत उध्दव ठाकरे आणि आदीत्य ठाकरे यांच्यावर टीका केली. बाळासाहेबांची शिवसेना संपविण्यात ज्यांचा मोठा वाटा होता, जे वारंवार स्वातंत्रवीर सावरकर यांच्यावर कशाही पध्दतीने टिका करतात, त्यांचे पाय मातोश्रीला लागणे हे कदीही न पटण्यासारखे असल्याचे त्यांनी सांगितले. परंतु ते आले नाहीत तर त्यांनी आपला पीए पाठविला आणि उध्दव यांनी दिल्लीला यावे तिकडेच सोनीया गांधी आणि राहुल गांधी आपल्याला भेटतील असे सांगितले आहे.

त्यामुळे आता दिल्लीला जाऊन मुजरा करणार का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. काही दिवसांपूर्वी सिल्वर ओकला गेले आता दिल्लीला जात आहेत, तुमच्यातील ठाकरी बाणा गेला कुठे असा सवाल उपस्थित करीत आज बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांना हे बिलकुल आवडले नसते. ते होते तेव्हा अनेक दिग्गजांनी मातोश्रीवर हजेरी लावली होती. अगदी शरद पवार यांनी देखील मात्र आता ती हिम्मत गेली कुठे असा सवालही त्यांनी उपस्थित केला.





अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121