मुख्यमंत्र्यांच्या गुवाहाटी आणि दावोस दौऱ्याशी काय आहे 'श्री श्री रविशंकर' यांचं कनेक्शन?

    02-Feb-2023
Total Views |


 
मुख्यमंत्र्यांच्या गुवाहाटी आणि दावोस दौऱ्याशी काय आहे 'श्री श्री रविशंकर' यांचं कनेक्शन?
 
मुंबई : जालना जिल्ह्यात सलाम किसान आणि वरद क्रॉप सायन्स यांच्यातर्फे शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. ‘जलतारा- जलसंधारणातून ग्रामसमृध्दीकडे’ ही या शेतकरी मेळाव्याची संकल्पना आहे. यानिमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते श्री श्री रविशंकर पहिल्यांदाच एका व्यासपीठावर एकत्र आले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्री श्री रविशंकर यांचे तोंडभरून कौतुक केले. शिवाय, गुवाहाटीला असताना श्री श्री रविशंकर यांचा फोन आला होता. अशी माहिती ही त्यांनी यावेळी दिली.
 
मुख्यमंत्री म्हणाले, "आम्ही गुंतवणूक आणण्यासाठी दावोसला गेलो होतो. तिथेही गुरुदेव आम्हाला भेटले. दावोसमध्ये आम्ही १ लाख ४० हजार कोटींचे करार केले. ते प्रत्यक्षात आणण्याचे काम आम्ही करुच, त्यांचे काम मोठे आहे. आज राज्य सरकारच्या माध्यमातून सहा महिन्यांमध्ये अनेक मोठे निर्णय घेतले. एकही निर्णय आमच्या वैयक्तिक लाभाचा नाही. जनतेसाठीचे सर्व निर्णय घेतले.”
 
“महाराष्ट्र ही संताची भूमी आहे. आज या भूमीमध्ये श्री श्री रविशंकर आले आहेत. त्यांचे आशीर्वाद तुम्हा सर्वांना मिळणार आहेत. जेव्हा आम्ही गुवाहाटीला होतो, तेव्हा श्री श्री रविशंकर यांनी मला फोन करुन आशीर्वाद दिला होता. आम्ही त्यांना सांगितले की, आम्ही लढाई सुरु केली आहे. ते म्हणाले, “तुम्ही चांगले काम करत आहात. तुम्हाला यश मिळेल.” गुरुदेव चांगले काम करणाऱ्यांच्या पाठिशी उभे राहतात. तो कार्यक्रम त्यावेळी झाला म्हणूनच आज हा कार्यक्रम पार पडत आहे." असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.