चैत्यभूमीवर भरला पुस्तकप्रेमींचा मेळा!

    06-Dec-2023   
Total Views |
Chaityabhoomi books selling news

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनीनिमित्त दि. 5 आणि 6 डिसेंबर रोजी 50 हून अधिक पुस्तक विक्रीचे स्टॅाल दादर चैत्यभूमी आणि शिवाजी पार्कवर उभारण्यात आले होते. तसेच ‘बार्टी’, पुणे यांच्यामार्फत पुस्तक स्टॉल उभारण्यात आला होता. या स्टॉलवर पुस्तक खरेदीवर 85 टक्के सूट देण्यात आली होती.


Chaityabhoomi books selling news


भारताचे संविधान, बुद्ध आणि त्यांचा धम्म या पुस्तकांना विशेष मागणी होती. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेले सर्व खंड तसेच चांगदेव खैरमोडे यांचे आणि बी.सी. कांबळे यांचे खंड विक्रीस ठेवण्यास आले आहेत. त्याचबरोबर भारतीय संविधान, जातीव्यवस्थेचे निर्मूलन ही पुस्तकेदेखील पुस्तक स्टॉलवर उपल्बध होती.


Chaityabhoomi books selling news

ज्यांची किमान किंमत 60 रुपयांपासून सुरू होते. त्याला लोकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. अनेक लहानमोठे प्रकाशनांनी, विक्रेत्यांनी शिवाजी पार्कवर हिंदी, मराठी, इंग्रजी अशा भाषेतील पुस्तक विक्रीचे स्टॉल उभारले होते. लाखो पुस्तक विक्री झाल्याचा अंदाज आहे.
 
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयांयी जत्रेत गेल्यावर फुग्यांची खरेदी करत नाही, तर पुस्तकांची खरेदी करतात. त्यामुळेच ही एक वैचारिक क्रांती आहे.- सत्येंद्रनाथ चव्हाण, विभागप्रमुख, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी)


दरवर्षीपेक्षा यावर्षीचा लोकांचा पुस्तक विक्रीचा कल वाढलेला आहे. त्यात ‘पद्मश्री’ रमेश पंतगे यांची तसेच महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेली पुस्तकांची विक्री मोठ्या प्रमाणात झालेली आहे.- मकरंद ताम्हाणकर, व्यवस्थापक, ज्ञानम् प्रकाशन.

 

सुप्रिम मस्कर

इतिहास आणि राज्यशास्त्र विषयात पदवीचे शिक्षण पुर्ण केले आहे. सध्या साठ्ये महाविद्यालयात 'एमएसीजे'च्या प्रथम वर्षात शिकत आहेत. मुंबई विद्यापीठातून 'लोककला' या विषयात पदविका पूर्ण केली आहे. वक्तृत्व स्पर्धा, अभिनय स्पर्धांमध्ये अनेक परितोषिके प्राप्त.
अग्रलेख
जरुर वाचा
कल्याणमध्ये चिमुकल्यांची शाळा मालवाहतूक टेम्पोमधूनच सुरू

कल्याणमध्ये चिमुकल्यांची शाळा मालवाहतूक टेम्पोमधूनच सुरू

ना दरवाजे, ना अटेंडंट, ना सुरक्षा विद्यार्थी लोंखडीपट्टयांना धरून करतात प्रवास अंबरनाथ मधील अपघाताच्या घटनेने संपूर्ण राज्याला हादरवून सोडले असतानाच कल्याणात एका खाजगी शाळेतील विद्यार्थ्यांना चक्क एका मालवाहतूक करणाऱ्या टेम्पोमधून शाळेत ने-आण केली जात आहे. विशेष म्हणजे मुलांच्या सुरक्षिततेसाठी एक ही अटेंडंट (सहाय्यक) सोबत नाही. विद्यार्थ्यांचा धोकादायक प्रवास सुरू असताना आरटीओच्या अधिकाऱ्याचे मात्र त्याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. त्यामुळे अपघात झाल्यानंतरच जाग येणार का असा प्रश्न आता सर्वसामान्यांकडून ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121