जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी सुनील केदार दोषी ; कमीत कमी शिक्षा द्यावी अशी वकिलांकडुन मागणी
22-Dec-2023
Total Views | 441
नागपूर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री सुनील केदार यांना मोठा झटका बसला आहे. नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँक घोटाळ्याप्रकरणी सुनील केदार यांना नागपूर जिल्हा व सत्र न्यायालयाने मुख्य आरोपी मानून दोषी ठरवले आहे. त्यासोबतच अन्य पाच जणांवरील गुन्हासुद्भा सिद्ध झाला आहे. त्याव्यतिरीक्त तिघांची न्यायालयाने पुराव्याच्या आधारे निर्दोष मुक्तता केली आहे.
२००२ मध्ये १५० कोटींचा सहकारी बँक घोटाळा उघडकीस आला. यामध्ये नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने पाच कंपन्यांच्या मदतीने बँकेच्या रकमेतून सरकारी रोखे (शेयर्स) खरेदी केले होते. इंद्रमणी मर्चंट्स प्रायव्हेट लिमिटेड, सेंचुरी डीलर्स प्रायव्हेट लिमिटेड, सिंडिकेट मॅनेजमेंट सर्विसेस, होम ट्रेड लिमिटेड, आणि गिलटेज मॅनेजमेंट सर्विसेस या च्या खाजगी कंपन्या आहेत. या कंपन्या पुढे जाउन दिवाळखोरीत निघाल्या होत्या. या कंपन्यांनी कधीच बँकेला सरकारी रोखही दिले नाही आणि बँकेची रक्कमही परत केली नाही अस सांगण्यात आल होता. सुनील केदार हे नागपूर जिल्हा बँकचे अध्यक्ष होते. या प्रकरणाचा तपास सीआयडी कडे देण्यात आला होता.
२१ वर्षांनंतर या प्रकऱणावर निकाल दिला जात आहे. या प्रकरणात सुनील केदार, अशोक चौधरी, केतन शेठ, अमित वर्मा, सुबोध भंडारी, नंदकिशोर त्रिवेदी या सहा जणांनी दोषी ठरवण्यार आल आहे. सुनिल केदार यांना दोषी ठरवल्यानंतर त्यांच्या वकिलांनी ते लोकप्रतिनिधी आहेत त्यांना कमीत कमी शिक्षा द्यावी अशी मागणीही केली आहे. त्यावर युक्तीवादही सुरु आहे.
भाजप नेते व माजी खासदार किरीट सोमय्या यांनी २००२ साली या घोटाळ्याचा संसदेत, रिझर्व्ह बँकेत आणि भारत सरकार यांच्याकडे पाठपुरावा केला होता. किरीट सोमय्या यांनी 'एक्स' वर पोस्ट करत यासंदर्भात माहीती दिली आहे.