विकसित भारत संकल्प यात्रेचा दुसरा टप्पा शुक्रवारपासून होणार सुरू!

    14-Dec-2023
Total Views |

Mumbai


मुंबई :
विकसित भारत संकल्प यात्रेचा दुसरा टप्पा १५, १६ आणि १७ डिसेंबर रोजी राबविण्यात येणार आहे. यानिमित्ताने महापालिकेतील विविध प्रभागात अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे १६ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता कर्मवीर दादासाहेब गायकवाड मैदान, सिध्दार्थ नगर, कल्याण पूर्व येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील उपस्थित राहणार आहेत.
 
भारत सरकारच्या फ्लॅगशिप योजनांचे लाभ लक्ष्यित लाभार्थ्यांपयंत पोहचविण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत आयुष्यमान भारत, पीएम स्वनिधी, स्वच्छ भारत मिशन, खेलो इंडिया, पीएम उज्वला योजना, पी एम मुद्रा लोन्स, पीएम आवास योजना, अटल मिशन फॉर रिज्युवनेशन (अमृत) पीएम भारतीय जन औषधी योजना, आधारकार्ड अपग्रेडेशन इत्यादी योजनांची माहिती देण्याकरिता स्टॉलची उभारणी करण्यात येणार आहे.
 
याशिवाय सर्व कार्यक्रमांच्या ठिकाणी शासकीय योजनांची माहिती चित्रफीतच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. त्यासाठी डिजीटल स्क्रिन असणारी सुसज्ज व्हॅन देखील उपलब्ध असणार आहे. या अभियानाचा पहिला टप्पा महापालिका हद्दीत ५, ६, ७ डिसेंबर रोजी पार पडला. या टप्प्यात महापालिका मुख्यालय कल्याण, आय प्रभाग कार्यालय, ड प्रभाग कार्यालय, बल्याणी, गांवदेवी मंदीर, डोंबिवली पू. आनंद नगर उद्यान डोंबिवली पश्चिम येथे राबविण्यात आला.
 
विकसित भारत संकल्प यात्रेला १५ डिसेंबर रोजी सकाळ साडे दहा वाजता मोरया नगरी, आशेळे, कल्याण पूर्व येथून सुरूवात होणार आहे. त्यानंतर दुपारी तीन वाजता आयरेकर चौक, आयरेगाव डोंबिवली पूर्व येथे कार्यक्रम होईल. १६ डिसेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजता खडेगोळवली, विठ्ठलमंदीर, कल्याण पूर्व तर दुपारी तीन वाजता कर्मवीर दादासाहेब गायकवाड मैदान, सिध्दार्थ नगर येथे संकल्प यात्रेनिमित्त शासकीय योजनांची माहिती दिली जाणार आहे. १७ डिसेंबर रोजी सकाळी साडे दहा वाजता सेंट लॉरेन्स इंटरनॅशनल स्कूल जवळ, उंबर्डे रोड, कल्याण पश्चिम व दुपारी तीन वाजता गफूर डोन चौक, कल्याण प. येथे विकसित भारत संकल्पयात्रेचा दुसरा टप्पा पार पडणार आहे. या कार्यक्रमाच्या दिवशी नागरिकांनी आणि लाभाथ्र्यानी उपस्थित राहावे असे आवाहान कडोंमपा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.