कन्हैयालालप्रमाणे सोहनलालला धमकी! पीएफआयच्या नावाने आले पत्र, वाचा काय लिहिले आहे?

    11-Dec-2023
Total Views |
 
Sohanlal Jatav
 
 
जयपुर : राजस्थानमधील कन्हैयालाल खून प्रकरणानंतर आता शिंपी सोहनलाल जाटव यालाही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्याला मिळालेल्या पत्रात त्याने दुकान रिकामे केले नाही तर त्याच्यावर बॉम्बस्फोट केला जाईल, असे म्हटले आहे. हे पत्र पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या नावाने पाठवण्यात आले आहे. हे प्रकरण अलवरमधील पोलीस स्टेशन हद्दीतील चिकणी गावचे आहे. याप्रकरणी सोहनलाल याने गुरुवारी (७ डिसेंबर २०२३) गुन्हा दाखल केला होता. तक्रारीत त्याने म्हटले आहे की, 13 नोव्हेंबर रोजी त्यांना पोस्टाने पत्र आले होते, ज्यामध्ये त्यांना दुकान रिकामे करण्यास सांगितले होते.
 
यासंदर्भात सोहनलाल जाटव यांनी सांगितले की, त्यांनी १९७१ मध्ये दुकानाची जागा खरेदी केली होती. तेव्हापासून त्याचा कोणाशीही वाद नव्हता. फार पूर्वी त्याचा रती मोहम्मद नावाच्या व्यक्तीशी वाद झाला होता पण नंतर हे प्रकरण मिटले आणि तेव्हापासून त्याचे कोणाशीही भांडण झाले नाही. मात्र 25 दिवसांपूर्वी त्यांना एक पत्र आले. पत्रात लिहिले होते, “मी काय म्हणतो ते नीट समजून घ्या, हे तुमचे दुकान आहे. ही जागा मुस्लिमांची आहे. हे सरदारांचे दुकान आहे आणि रोहतास कुमारचे दुकान आहे. सरपंच आणि आस मोहम्मदच्या लोकांनी सांगितले आहे की ही सर्व जागा मुस्लिम बांधवांची असून तुम्ही ती ताब्यात घेतली आहे. मी आत्ता विनम्रपणे बोलतोय, जागेची योग्य किंमत घ्या आणि जागा रिकामी करा, मी कोण आहे… PFI… मी 31 डिसेंबरपर्यंत वेळ देत आहे, नाहीतर PFI बद्दल जगाला माहिती आहे, मी एका रात्रीत बॉम्बने सर्व काही नष्ट करीन." असे पत्रात म्हटले आहे.
 

Sohanlal Jatav 
 
सोहनलाल जाट यांना या पत्राची माहिती इतक्या दिवसांनी का दिली,असे विचारले असता त्यांनी हे पत्र 25 दिवसांपूर्वी पोस्टाने मिळाल्याचे सांगितले. पण विधानसभा निवडणुकीत वातावरण बिघडू नये, म्हणून ते गप्प राहिले. निकालानंतर त्यांनी ७ डिसेंबर रोजी अलवर सदर पोलीस ठाणे गाठून आपली तक्रार दाखल केली. पोलिस स्टेशनचे अधिकारी दिनेश मीना यांनी सांगितले की, गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू करण्यात आला आहे.
 
2022 मध्ये राजस्थानच्या उदयपूरमध्ये इस्लामिक कट्टरवाद्यांनी कन्हैयालाल नावाच्या एका शिंपीची त्याच्या दुकानात घुसून हत्या केली होती. कन्हैयालालची एकच चूक होती की त्याने नुपूर शर्माला पाठिंबा दिला. यानंतर त्याला धमकी मिळाली होती.