नाका कामगारांच्या कौशल्य विकासासाठी ४ कोटी ८५ लाखांची तरतूद - मंगलप्रभात लोढा

    01-Dec-2023
Total Views | 32
Mangalprabhat Lodha news

मुंबई
: बांधकामाची आधुनिक पद्धती लक्षात घेऊन नाका कामगारांना कौशल्य विकासाचे धडे देण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे. त्यानुसार, मुंबई शहर आणि उपनगरातील ७ हजार ५०० नाका कामगारांना पूर्वज्ञान कौशल्य विकसित करण्यासाठी पहिल्या टप्प्यात ४ कोटी ८५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली.

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत प्रमोद महाजन कौशल्य युवा विकास योजनेतून भारतीय मजदूर संघ आणि बांधकाम सेक्टर स्किल कौन्सिल यांच्या संयुक्त विद्यमाने कामगारांना पूर्वज्ञान कौशल्य प्रमाणिकरण कार्यक्रमाचे गुरुवारी आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री लोढा बोलत होते. यावेळी महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल सोनवणे, भारतीय मजदूर संघाचे सचिव अनिल घुमने व नाका कामगार उपस्थित होते.

मंत्री लोढा म्हणाले की, राज्यामध्ये बांधकाम क्षेत्रात कुशल कामगारांची आवश्यकता आहे. परंतु, आजमितीला या क्षेत्रात ४७ टक्के कुशल कामगारांचा अभाव दिसून येतो. महाराष्ट्र हे प्रगतिशील राज्य असून, बांधकाम क्षेत्रात होणारे बदल लक्षात घेता, नाका कामगारांना कौशल्य विकसित करणे आवश्यक आहे. या उद्देशाने बांधकाम कामगारांसाठी पूर्वज्ञान कौशल्य प्रमाणिकरण कार्यक्रम राबवला जात आहे. त्याचा लाभ या कामगारांनी घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.यावेळी मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते नाका कामगारांना प्रशिक्षण विषयक साहित्याचे वाटप करण्यात आले.

पूर्वज्ञान कौशल्य प्रमाणिकरण उपक्रमांतर्गत प्रशिक्षण घेणाऱ्या प्रत्येक कामगाराचा कौशल्य विमा आमच्या विभागामार्फत काढण्यात येणार आहे. राज्यामध्ये बांधकाम क्षेत्रात असलेली कुशल कामगारांची उणीव भरून काढण्याचा प्रयत्न यानिमित्ताने केला जाणार आहे.- मंगलप्रभात लोढा, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री


 
अग्रलेख
जरुर वाचा
राष्ट्रहिताच्या विचारांनी ‘आयटीआय’मध्ये साजरा होणार शिवराज्याभिषेक दिन

राष्ट्रहिताच्या विचारांनी ‘आयटीआय’मध्ये साजरा होणार शिवराज्याभिषेक दिन

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनाचे औचित्य साधत कौशल्य विकास विभागाच्या वतीने येत्या दि. ६ जूनपासून राज्यातल्या सर्व आयटीआय संस्थांमध्ये राष्ट्रभक्तीच्या विषयांवर व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये भारताचा जाज्वल्य इतिहास आणि देशासाठी समर्पणाची भावना रुजावी, पर्यावरण संवर्धनाची भावना जागृत व्हावी, या हेतूने या व्याख्यानमालेचे आयोजन केल्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी बुधवार, दि. ४ जून रोजी मंत्रालय..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121