ड्रग्जमाफियांचा कर्दनकाळ ठरणार देवेंद्र फडणवीसांचं गृहमंत्रालय!

    17-Oct-2023
Total Views | 52
Drug smuggling news

एका पोलीस अधिकार्‍याची इयत्ता आठवीत शिकणारी मुलगी. एकेदिवशी अचानक बेशुद्ध पडली. त्यानंतर तिला दवाखान्यात नेण्यात आले. मात्र दवाखान्यात उपचार सुरू करण्याआधीच त्या १४ वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला.मात्र, तिचा शवविच्छेदन अहवाल मिळाला आणि तिच्या पोलीस अधिकारी असलेल्या पित्याला आणि कुटुंबाला काय करावे हे सुचेनासे झाले. कारण, शवविच्छेदन अहवालात लिहिले होते की, अंमली पदार्थाच्या प्रमाणाबाहरे सेवन केल्याने तिच्या मेंदूच्या नसा फुटल्या होत्या. तसेच त्या अल्पवयीन मुलीवर अनेकदा क्रूर लैंगिक अत्याचार झाला होता. ही घटना आहे केरळमधील आणि ही घटना घडली एप्रिल महिन्यात. आणि अशा अनेक घटनांमधून समोर येऊ लागलं, ड्रग्ज सेवन करणाऱ्या तरुणांच आणि तस्करांचं भयाण वास्तव! म्हणूनच आज आपण ड्रग्ज तस्करी कशी होते? ड्रग्ज सेवनासंबधी काही केस? आणि ड्रग्ज तस्करीला आळा घालण्यासाठी सरकारने उचलेली पावलं?
 
आज तुम्ही तुमच्या स्मार्टफोनमधून गुगलवर ड्रग्ज असं टाईप केलं तर मागच्या २४ तासात घडलेल्या अनेक घटना तुम्हाला दिसतील. त्यात दोनशे कोटींचे ड्रग्स युरोपासह ऑस्ट्रेलियात पाठवल्या प्रकरणी ईडीची मुंबईत छापेमारी, काय आहे प्रकरण?,नाशिक ड्रग्ज प्रकरणात १० जणांना अटक, यापुढे हुक्का पार्लरवर पोलिसांची कारवाई होणार! अशा शीर्षकाच्या अनेक बातम्या आपल्याला पाहायला आणि वाचायला मिळतील. पण महाराष्ट्रात ह्या ड्रग्ज तस्करीच्या प्रकरणाची चर्चा सुरु झाली, ललित पाटील यांच्या ड्रग्ज प्रकरणापासून. मुळात पुण्याच्या ससून रुग्णालय परिसरात काही दिवसांपुर्वी २ कोटींचं ड्रग्ज सापडलं होते. तेव्हा या प्रकरणातील मुख्य आरोपी ललित पाटील पोलीसांच्या हातावर तुरी देऊन निसटला. मुळात ललित पाटील हा ड्रग माफिया आहे, पण कोणाला संशय येऊ नये म्हणून देश - विदेशात शेळ्या एक्स्पोर्ट करणाऱ्या व्यवसायिकाचा मुखवटा त्यानं परिधान केला होता. भाऊ भूषण पाटीलसह त्यानं दुबईला शेळ्या पाठ्वल्याच रेकॉर्ड उपलब्ध आहे. पण शेळ्यांच्या नावाखाली त्यानं ड्रग्ज ही दुबईला पाठवल्याच पोलीस सूत्रांच म्हणणं आहे. त्याचबरोबर मलेशिया, थायलंड या इतर देशांमध्ये देखील ललित पाटीलने अंमली पदार्थ पाठवले होते. त्यामुळेच आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याच नेटवर्क तयार झालं. याच नेटवर्कचा उपयोग करून ललित पाटील भारताबाहेर पळाल्याची शक्यता सध्या व्यक्त केली जात आहे. दरम्यान या प्रकरणामुळे पुणे पोलीस दलातील नऊ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे.
 
मग भारतात दुसऱ्या देशाच्या सीमेवरून ड्रग्ज तस्करी कशी होते. एका गुप्तचर अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, सीमावर्ती भागातील शेतकरी किंवा मजुरांना अंमली पदार्थाचे पॅकेट्स दिली जातात. ते त्यांना सुरुवातीला घरी ठेवावे लागतात. पण एकदा तस्कर भारतात आले की, कुरिअर किंवा वेगवेगळ्या मार्गाने तस्कर अंमली पदार्थाची तस्करी करतात. सुरुवातीला अंमली पदार्थाचे पाकिट शहरांमध्ये पूर्वनियोजित ठिकाणी नेले जातात. त्यानंतर पुन्हा कुरिअर करून विक्रेत्यांकडे ते पाठवले जातात. आणि मग सगळ्यात शेवटी तस्कर ते वितरकांना पाठवतात आणि तेथून ते ग्राहकांपर्यंत पोहोचतात.दरम्यान एका वृत्तसंस्थेला माहिती देताना सीमेवर गुप्तचर विभागात कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्याने सांगितले की, "या संपूर्ण प्रक्रियेत सहभागी असलेल्या लोकांना कमिशन दिले जाते. पंरतु या व्यवसायात सामील असलेल्या लोकांना मुख्य सूत्राधाराबद्दल फार माहिती नसते. त्यामुळेच ड्रग्ज किंगला पकडणे सोपे नसते.
 
तसेच भारतीय सीमेत अंमली पदार्थांची तस्करी करण्याचे अनेक मार्ग आहेत. २०१६ मध्ये पंजाबमधील अंमली पदार्थांच्या संकटावर संसदेत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय मंत्री हरिभाई पार्थीभाई चौधरी म्हणाले होते, "पंजाबमध्ये ड्रग्जची तस्करी करण्यासाठी अनेक पद्धतींचा अवलंब केला जात आहे, जसे की बोगदे बनवून पाईपद्वारे सीमेपलीकडून भारतीय हद्दीत अंमली पदार्थाचे पाकिट टाकून त्याचा पुरवठा केला जातो.मग ह्या अंमली पदार्थांच्या सेवनामुळे उच्च रक्तदाब, नाकातून रक्त येणे, हिंसक भावना उचंबळून येणे, रक्तवाहिन्यांत अडथळा, यकृत, किडनी, फुप्फुसांचे आरोग्य बिघडणे, नैराश्य,आणि इतरही असंख्य शारीरिक, मानसिक व्याधी जडतात. शरीराचा आणि मनाचा र्‍हास झाल्याने ड्रग्जसेवन करणारी व्यक्ती निरुपयोगीच ठरते, त्याचे नुकसान त्या व्यक्तीला, कुटुंबाला आणि समाजाला भोगावे लागते. त्यापेक्षाही अधिक धोकादायक बाब म्हणजे, ड्रग्जमुळे देशाची अपरिमित हानी होते.
 
ड्रग्जचा व्यापार बेकायदेशीर असल्याने त्यावर कोणाचेच नियंत्रण नसते. त्यातून लाखो-कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असते आणि त्यात ओतला जाणारा पैसा अवैध मार्गानेच कमावलेला असतो. तसेच ड्रग्जमाफिया कोणी सर्वसामान्य व्यापारी, व्यावसायिक, उद्योजक नसतात, तर त्यांचे लागेबांधे आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्कर, हवाला नेटवर्क, दहशतवादी संघटना आणि भारताला शत्रू मानणारे देश, अशा सर्वांशीच असतात. त्यामुळे त्यातला पैसा देशविघातक शक्तींच्या हातात जात असतो व त्याचा वापर पुन्हा भारताविरोधातच वेगवेगळ्या प्रकारे केला जातो. त्यामुळे अंमली पदार्थाच्या तस्करीला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र सरकर कठोर पावलं उचताना दिसत आहेत.

अगदी काही दिवसांपूर्वीचीच गोष्ट पत्रकारांनी देवेंद्र फडणवीसांना विमानतळावर प्रश्न विचारला. देवेंद्रजी ललित पाटील सापडत नाहीयेत. दोन आठवड्यापासून फरार आहे. एव्हाना ललित पाटीलचं प्रकरण हे संपूर्ण महाराष्ट्रात गाजलं होतं. ललित पाटील प्रकरणात प्रश्न विचारल्यानंतर फडणवीसांनी धीरगंभीर आणि तितक्याच आश्वस्त चेहऱ्यानं काय सांगितलं ते तुम्हीच पहा.त्यामुळेच महाराष्ट्र सरकारचे मुख्य लक्ष ड्रग्ज तस्करी संपुष्टात आणणे असून त्यावर सर्वांनी कठोर कारवाई करावी, असे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले. तसेच येत्या काही दिवसांत ड्रग्ज विरोधातील कारवाई आणखी तीव्र करण्यात येणार असून त्यातील आरोपींनाही शोधून काढले जाईल,” असा इशारा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलायं. दरम्यान, नाशिकमधील ड्रग्ज प्रकरण उघड झाल्यानंतर राज्य सरकारने ड्रग्ज विरोधी मोहीम हाती घेतली आहे.

”केंद्र सरकारमध्ये गृहमंत्री असलेल्या अमित शाह यांनीही काही दिवसांपूर्वीच हाच इशारा दिला होता. देशातून ड्रग्जही संपवू आणि ड्रग्ज माफियांनाही संपवू, असा थेट संदेशच त्यांनी दिला आहे. देशातील प्रत्येत जिल्ह्यात अशा समित्यांचे गठन केलयं. याद्वारे जिल्ह्यातील प्रत्येक कारवाईवर लक्ष ठेवले जाईल.तरुण पिढीला नासवणारे हे अंमली पदार्थ आणि त्यांच्या तस्करांवर लवकरच कडक कारवाईच्या आणखी बातम्या तुम्हाला काही दिवसांत ऐकायला पहायला आणि वाचायलाही मिळतील. एक नागरिक म्हणून आपल्या आजूबाजूला अशी काही घटना घडत असल्यास त्यांची माहिती पोलीसांपर्यत पोहवणे हे आपले कर्तव्य समजायला हवे.



अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121