'या' दिवशी मराठा आंदोलनाची पुढची दिशा ठरणार: मनोज जरांगे

    14-Oct-2023
Total Views |

Jarange  
 
 
मुंबई : मनोज जरांगे पाटील यांची जालन्याच्या अंतरवली सराटीत विराट सभा होत आहे. धुळे-सोलापूर महामार्गावर सभेसाठी येणाऱ्यांची प्रचंड गर्दी झाली आहे. १५० एकर मैदानावर ही सभा होत आहे. यावेळी सभेत बोलताना मनोज जरांगे म्हणाले, "शांततेतल्या आंदोलनानेच मराठा समाजाला एकजुट केलं आहे. शांततेत प्रचंड शक्ती आहे. या पूढचेही आंदोलन हे मराठा समाज शांतीपूर्ण पद्धतीने करेल. २२ ऑक्टोबरला मराठा आंदोलनाची पुढची दिशा ठरणार." असे जरांगे पाटील म्हणाले.
 
आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना मनोज जरांगे म्हणाले, "आम्हाला आरक्षण द्या. नाहीतर ४०व्या दिवशी आम्ही उत्तर देऊ. आरक्षण मिळाल्याशिवाय एक इंचही मागे हटणार नाही. मराठ्यांचं आगी मोहोळ शांत आहे. पण हे मोहोळ जर एकदा उठलं तर काही खरं नाही. केंद्र आणि राज्य सरकारला विनंती आहे की, त्यांनी हा प्रश्न मार्गी लावावा. सरकारने दहा दिवसांत आरक्षण द्यावे असा अल्टीमेटम दिला आहे. मराठा समाजाला आरक्षण द्या, मराठा समाज तुम्हाला डोक्यावर घेईल."
 
"मराठ्यांचा ओबीसीत समावेश करा. कोपर्डी बलात्कारातील आरोपींना फाशी द्या. मराठा आरक्षणात बलिदान दिलेल्या ४५ बांधवांना सांगितलेला निधी आणि सरकारी नोकरी द्यावी. दर दहा वर्षाने आरक्षण दिलेल्या ओबीसी बांधवांचा सर्व्हे करावा. सर्व्हे करुन प्रगत जाती बाहेर काढण्यात याव्यात. PHD करणाऱ्या विद्यार्थ्यांना जास्तीचा निधी देऊन , त्यांचे प्रश्न तातडीने मार्गी लावावे. महाराष्ट्रातील मराठा समाजाला वेगळा प्रवर्ग करून आरक्षण द्या. NT, VJNT प्रवर्गासारखे टिकणारे आरक्षण द्या." अश्या मागण्या मनोज जरांगे पाटील यांनी केल्या आहेत.